प्रेमासाठी काय पण : दोन लेकरांची माय प्रियकरा सोबत भुर्रर्र..... विवाहित पुरुषीही सैराट या जिल्ह्यात वाढले प्रमाण
जालना : बायको सतत त्रास देते जेवायला देत नाही अशा किरकोळ कारणावरून पुरुषांनी तर दारुडा नवरा मारहाण करतो सतत भांडण करतो यासारख्या कारणावरून महिलांनी घर सोडली आहे अनेक महिला पुरुषांनी लग्नानंतर ही प्रेम प्रकरणातून घर सोडल्याचे प्रकार समोर आले आहेत. यात दोन लेकरांची माहिती देखील आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलासोबत सैराट झाल्याची समोर आली आहे. मागील 15 महिन्यात अशाच विविध कारणांनी जिल्ह्यातील 477 महिला व 335 पुरुषांनी घर सोडली आहे . पोलिस दप्तरी बेपत्ता म्हणून याची नोंद झाली आहे आकर्षण आणि हुल्लड वय असल्याने अनेक मुले मुली अल्पवयीन असतानाच सैराट होतात त्याच्या तक्रारी ही पोलीस विभागात मोठ्या प्रमाणात आहेत. यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालली आहे हे देखील वास्तव आहे परंतु या अल्पवयीन मुलाप्रमाणे 18 वर्षावरील मुले मुली महिला पुरुषी घरातून निघून जात असल्याचे समोर आले आहे पोलिसांकडून त्यांचा शोध घेऊन त्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन केली जात आहे.
याचे कारण शोधल्यावर अनेक धक्कादायक बाबी समोर येतात तर काही प्रकरणांमध्ये किरकोळ कारणे असताना केवळ रागाच्या भरात अनेकाने घर सोडलेले असते घरातून निघून गेल्यावर काही लोकांना पश्चाताप झाला त्यामुळे ते स्वतःहून घरी परत असल्याचे सांगण्यात आले आहे पोलिसांकडून गेल्या पंधरा महिन्यात बेपत्ता झालेल्या 376 महिला आणि 261 पुरुषांचा शोध घेतला आहे.
काय सांगते आकडेवारी पहा
बेपत्ता शोध
- महिला 477 376
- पुरुष. 335. 261
- मुली. 139. 130
- मुले. 36. 33
0 Comments