दुःखद घटना :माळशिरस तालुक्यातील मांडवे येथे वीज पडून महिलेचा मृत्यू
माळशिरस /प्रतिनिधी: प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आहे, त्यातच आज दुपारी झालेल्या पावसामध्ये मांडवे ता. माळशिरस येथील सौ सोनाली मुकिंदा कोळपे यांच्या अंगावर विज पडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या घटनेमुळे मांडवे गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
माळशिरस तालुक्यात अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात वरूणराजाचे दुपारी दमदार आगमन झालेले होते. अनेक ठिकाणी पावसाच्या सरी मोठ्या प्रमाणात कोसळत होत्या. अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यामध्ये मांडवे गावातील सौ. सोनाली मुकिंदा कोळपे आपल्या शेतामध्ये काम करीत होत्या. पाऊस सुरू असल्याने त्या झाडाखाली थांबलेल्या होत्या. पाऊस बंद झाल्यानंतर पुन्हा शेतामध्ये काम करीत असताना अचानक वीज अंगावर कोसळली असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. ऐन गौरी महालक्ष्मीच्या आगमना दिवशी अशी दुःखद घटना घडल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मांडवे गावामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे,त्याच्या पाश्चात तीन मुली, एक मुलगा, पती, सासू-सासरे असा परिवार आहे.
0 Comments