सोयाबीनला पुन्हा उतरती कळा, दर घसरल्याने शेतकरी हवालदिल शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
धाराशिव/राजगुरु साखरे : घटलेल्या उत्पादनाची कसर सोयाबीनच्या वाढीव दरातून शेतकऱ्यांच्या पदरी पडेल असे चित्र हंगामाच्या सुरुवातीला होते, मात्र दिवाळीनंतर सोयाबीन दराला लागलेली उतरते कळा अद्यापही कायम आहे. दिवाळी सणाच्या पूर्वी तुळजापूर, लातूर बाजार समितीमध्ये प्रतिक्विंटल 5250 रुपयावर गेलेली सोयाबीन तुळजापूर बाजार समितीमध्ये शनिवारी दि,9 रोजी थेट 4 हजार 850 वरच येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून दराबाबत गतवर्षीचीच पुनरावृत्ती होणार की काय अशी बाजारपेठेची स्थिती झाली आहे.
निसर्गाचा लहरीपणा आणि सोयाबीन दरातील चढ उतार शेतकऱ्यांसाठी नुकसानीचाच ठरत आहे हंगामीच्या सुरुवातीला दरात विक्रमी वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी विक्री करण्यापेक्षा साठवणुकीवरच भर दिला होता. त्यामुळे दिवसाकाठी हजारो क्विंटल वर गेलेले आवक आता तुळजापूर बाजार समितीमध्ये 500 क्विंटलच्या आता आली आहे. सोयाबीन वर प्रक्रिया करून सोया पेंड आणि खाद्यतेल तयार केले जाते गेल्या काही दिवसापासून सोया पेंडीच्या मागणीत कमालीची घट झाली आहे त्यामुळे सोयाबीनचे दर घसरले असल्याचे व्यापाऱ्यातून बोलले जात आहे. वाढीव दराच्या अपेक्षणी शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात थप्पीलाच लावली आहे.
घटत्या दरामुळे शेतकऱ्यांनी घेतलेला निर्णय नुसकानीचा ठरणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीनच्या दराबाबत शेतकरी कायम आशावादी राहिलेला आहे . यंदा जिल्ह्यात उत्पादनात मोठी घट झाली असून वाढीव दरातून पदरी चार पैसे पडतील असे चित्र झाले होते. मात्र मागील आठवड्यापासून या हंगामातील सोयाबीनचा भाव घसरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनच्या दरात झपाट्याने वाढ झाली. त्याचप्रमाणे आता घसरण सुरू आहे सोयाबीनवर प्रक्रिया करून बनवलेल्या पदार्थांना मागणी कमी असल्याचा हा परिणाम आहे. भविष्यात कमी अधिक पाच हजाराच्या आसपाच सोयाबीन स्थिरता वेल.फार काही मोठ्या अपेक्षा ठेवण्यात ' अर्थ ' नाही.
अशोक अग्रवाल, व्यापारी लातुर.
0 Comments