Hot Posts

6/recent/ticker-posts

हृदयद्रावक घटना : दोन सख्ख्या भावंडासह तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

हृदयद्रावक घटना : दोन सख्ख्या भावंडासह तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

सोलापुर  : दोन सख्ख्या  भावांसह तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील करकंब गावात घडली आहे. ही घटना शनिवारी, १३ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली . गणेश नितीन मुरकुटे(7) ,हर्षवर्धन नितीन मुरकुटे(8) आणि मनोज अंकुश पवार(11)अशी या मयत मुलांची नावे आहे. 

हे तिघे खेळता -खेळता शेततळ्याच्या पाण्यात उतरली आणि त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते पाण्यात बुडाली.बाहेर गेलेली मुलं संध्याकाळ झाली तरी अजून कशी घरी परत आली नाहीत, म्हणून त्यांच्या आईवडिलांनी शोध सुरू केला. त्यावेळी घराच्या जवळच असलेल्या परदेशी या शेतकऱ्याच्या शेततळ्यात त्यांचे मृतदेह आढळून आले.
मुलांना तातडीने करकंब येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिन्ही मुलं मृत झाल्याचे घोषित केले.मृतदेह पाहतातच आईने टाहो फोडला. या घटनेमुळे त्यांच्या गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.तर या दुर्दैवी घटनेमुळे  करकंब गावावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments