हंगामाच्या तोंडावर तुरीच्या दरात घसरण शेतकरी चिंतेत
धाराशिव: तुरीचे दर हमीभावापेक्षा कमी झाले आहेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे तुरीच्या दरात घसरण झालेली शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे खरिपातील नगदी पीक अशी ओळख असलेल्या तुरीचे दर घसरले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाली आहे. तुरीचे पडते तर बघता शेतकऱ्यांना किमान हमी दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.
अवकाळी पावसामुळे तुरीची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्चही करावा लागला थोडीशी क्षेत्र कमी झाल्याने तुरीचे दर वाढतील असा विश्वास शेतकऱ्यांना होता परंतु प्रत्यक्षात तुरीच्या दरात मोठी घसरण झाली. तूर पिकाला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना असतानाच तुरीचे जेमतेम आगमन न होते तोच तुरीचे दर कोसळले आहेत.
सोयाबीन पिकांनी शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्याने उत्पादन खर्चही वसूल झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांची सारी भिस्त ही तूर या नगदी पिकावर होती परंतु तिलाही हमीभावापेक्षा कमी भाव मिळाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे सतत हवामानात होणाऱ्या बदलाने तुरीची एकरी उत्पादन कमी झालेले दिसून येत आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुका परिसरातील काही भागात कापणी पूर्ण होऊन नवीन तुरीची बाजारात आवक वाढली आहे. या काळात दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नवीन तुरीला किमान सहा हजार आठशे ते सात हजार रुपये दर मिळत आहे. केंद्र सरकारने तुरीला 7 हजार 500 दर एवढा हमीभाव जाहीर केला असताना या दरापेक्षा कमी दर बाजारात मिळत आहे.
आता नवीन तूर बाजारात दाखल होत असताना हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी होत असल्याने तुर पीक शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे शेतकऱ्यांनी तुरीला किमान हमीभाव तरी मिळावा अशी मागणी केली आहे.
0 Comments