शेतीसाठी रक्ताच्या नात्याचा विसर ! भावानेच केला भावाचा खून चित्रपटाला लाजवेल असा रचला कट सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी, एलसीबी पोलिसांनी 12 तासाच्या आत लावला छडा
लातूर: शेत जमिनीवरून भावा भावांमध्ये मतभेद हे काही नवीन नाही मात्र हाच जमिनीचा मुद्दा किती कळीचा ठरतो याचा प्रत्यय बोपला तालुका लातूर जिल्हा लातूर येथील घटनेवरून आला आहे. भावाकडून आपली जमीन हडपली जात आहे याचा राग मनात धरून स्वतःच्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने भावाच्या डोक्यात हातोडा घालत आणि नंतर कासऱ्याने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना कव्हा शिवारात घडली खून करण्यासाठी भाऊ सोयरीकीचा एजंट कसा झाला आणि त्या पुढचा कट हे एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल असेच आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की लातूर तालुक्यातील कव्हा समशानभूमीच्या जवळ तावरजा नदीच्या पत्रात सोमवारी दिनांक 12 मे रोजी तालुक्यातील बोपला येथील दयानंद भगवान काटे वय (55) यांचा मृतदेह आढळून आला होता. घटनेच्या दोन दिवसानंतर मयत दयानंद काटे यांच्या मुलाच्या फिर्यादीवरून लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती; घटनेमागचे नेमके कारण काय याचा शोध घेऊन या प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेची टीम कामाला लागली आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर बारा तासाच्या आत सर्व काही समोर आले त्याचे झाले असे मयत दयानंद काटे यांना बोपला शिवारात दोन एकर शेती होती वर्षानुवर्षे भाऊ बांध कोरून आपली जमीन ताब्यात घेत असल्याची सल ही दयानंद च्या लहान भाऊ देवानंदला बोचत होती. भावाचा काटा काढण्यासाठी देवाने कट रचला होता याचे पोलिसाकडून बिंग उघडे पडले भाऊ दयानंद चा हातोड्याने वार करून कासऱ्याने गळा दाबून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
तुला सोडत नाही असे म्हणत हातोड्याने दयानंद च्या डोक्यात केली वार
आपल्या भावाच्या मुलाचे लग्न जमवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे देवानंदला ज्ञात होते हा मुद्दा पकडून तो त्याला सापडलेल्या मोबाईल वरून भावालाच म्हणजेच दयानंद ला सोयरीक जुळवायची असल्याचे म्हणत फोन करून बोलवत होता यापूर्वी त्यांनी विविध ठिकाणी भावाला बोलवून घेतली होती पण त्याला जे साध्य करायचे ते झाले नाही अखेर सोमवारी दिनांक 12 मे रोजी तुमच्या मुलाला चांगलं स्थळ आहे त्याबाबत बोलायचे म्हणून देवानंदने आपल्या भावाला कवा शिवारात बोलून घेतले. मुलाच्या स्थळाचा विषय आहे म्हणून भर उन्हात दयानंदने दुचाकी ला किक मारली आणि सांगितलेल्या स्थळ जवळ केले लग्न जुळणारा एजंट म्हणून फोन करणारा सक्का भाऊ देवानंद काटे आणि त्याचा अल्पवयीन मुलगा चार चाकी घेऊन त्याची वाट पाहत होते. दयानंदने एजंट बद्दल सांगताच देवानंद चा राग बदलला आणि आता तो रिंगणात सापला तुला सोडत नाही असे म्हणत गाडीतील हातोड्याने दयानंद च्या डोक्यात मारले एवढेच नाही तर देवानंद व त्याचे अल्पवयीन मुलाने कासऱ्याने त्याचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह तावरजा नदी परिसरातच सोडून ते फरार झाले दयानंद याला आलेल्या फोनवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास सुरू केला असता खुणाच्या कटासाठी सापलेल्या मोबाईलचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले अधिकचा तपास केला असता तोच सापडलेला मोबाईल हा देवानंद च वापरत असल्याचे समोर आले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे पोलीस हवलदार अर्जुन राजपूत ,युवराज गिरी ,राजेश कंचे ,राहुल सोनकांबळे मुन्ना मदने ,जमीर शेख ,गणेश साठे यांनी योग्य १२ तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणला अधिक तपास लातूर ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे करीत आहेत.
हरवलेल्या मोबाईल वरून लागला आरोपीचा छडा
मोठ्या भावाचा निर्दयपणे खून करून देवानंद हा अंत्यविधीपासून ते राख सावडण्याचा प्रत्येक विविध सहभागी होता शिवाय कोणाचा आपल्यावर संशय होऊ नये म्हणून प्रत्येक विधीचा निर्णय प्रक्रियेत आला होता.
घटनेच्या दोन दिवसानंतर ही घडलेल्या प्रकाराबद्दल तो काहीच बोलला नाही पण सापडलेला मोबाईल त्यांनी वापरला आणि त्याचे बिंग फुटले.
0 Comments