नळदुर्ग येथील तरुणाच्या हत्याप्रकरणी २ जणांवर गुन्हा दाखल, सामाजिककार्याच्या रागातून खुन झाल्याची माहिती, संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
तुळजापूर : माझ्या वडिलांना मारतोस काय असे म्हणत हाती धारदार शस्त्र कोयता घेऊन आलेल्या बावीस वर्षे तरुणाने सपासप वार करून एका तरुणाचा खून केल्याची घटना नळदृग येथील बस स्थानकाजवळ घडली. ही थरारक घटना नळदृग बस स्थानकासमोरील शिवराज हॉटेलच्या आवारात मंगळवारी रात्री उशिरा घडली आहे. याप्रकरणी बुधवारी नळदुर्ग पोलीस ठाण्यात आरोपी बाप-लेकाविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. या घटनेचा संपूर्ण सीसीटीव्ही समोर आला आहे याप्रकरणी मुलाला अटक केली आहे, दुसरा आरोपी जयकुमार गायकवाड यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नळदुर्ग परिसरामध्ये खळबळ उडाली असून परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,नळदुर्ग येथील बस स्थानकाजवळ असलेल्या शिवराज हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री महेश सूर्यकांत उर्फ पप्पू सुरवसे हंगामी मुक्काम पनवेल व आरोपी जयकुमार गोरख गायकवाड व 48 राहणार बौद्ध नगर नळदुर्ग हे वेगवेगळ्या ठिकाणी बसले होते याचवेळी या दोघांमध्ये नजरा नजर झाली असता रागाने का पाहिले असे म्हणत एकमेकांना शिवीगाळ सुरू केली. वाद वाढल्यानंतर हॉटेलच्या चालकाने दोघांनाही बाहेर पाठवले असता वाद आणखी विकोपाला गेला तोवर आरोपी जयकुमार गायकवाड यांनी भांडणाची माहिती मुलगा सोहन जयकुमार गायकवाड यास दिली. यावेळ सोहन यांनी हाती कोयता घेऊन अवघ्या काही क्षणातच तिथे दाखल झाला माझ्या वडिलांना मारतोस काय असे म्हणत सूर्यकांत सुरवसे यांच्या मानेवर धारदार कोयत्याने वार केला जमिनीवर कोसळल्यानंतरही सपासप वार करण्यात आल्याने ते रक्ता.रक्ताच्या थारोळ्यात पडले व त्यांची जागीच त्यांची प्राणज्योत मालवली. सामाजिक कार्यकर्ते म्हणून मयत सूर्यकांत यांची नळदृक्ष परिसरात ओळख होती . मात्र किरकोळ कारणावरून त्यांची निग्रण हत्या झाल्याने सर्वत्र हळूहळू व्यक्त केली जात आहे .दरम्यान या प्रकरणी मताची प्रकरणी पत्नी करून सूर्यकांत सुरवसे यांनी बुधवारी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून जयकुमार गोरख गायकवाड व 48 व सोहन जयकुमार गायकवाड दोघे राहणार बौद्ध नगर या बाप एकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमध्ये मयताच्या पत्नीचे काय म्हणणे
सूर्यकांत पप्पू सुरवसे यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने ते अधून मधून आपल्या गावी नळदुर्ग येथे यायचे मात्र गावातीलच जयकुमार गायकवाड हे सामाजिक कार्यात नेहमी अडथळा आणायचा तो पनवेलहून येथे येऊन सामाजिक कार्य का करतोस ? आम्ही सामाजिक कामकाज बघायला समर्थ आहोत तू ढवळढवळ करू नकोस असे म्हणून गायकवाड नेहमी वाद घालायचा यातून आपल्या पतीचा खून करण्यात आला असे मयत पप्पू सुरवसे यांची पत्नी प्रज्ञा सुरवसे यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केली आहे.
हल्ला इतका भीषण होता की,
पप्पू सुरवसे यांच्यावर झालेला हल्ला इतका भीषण होता की दोघा बाप लेकाचे कृत्य पाहून इतर लोकही बाजूला झाले होते आरोपी सोहम गायकवाड यांनी पप्पू सुरवसे यांच्या मानेवर तोंडावर पोटावर आणि पाठीवर कोयत्याने तब्बल सतरा वार केली एवढेच नाही तर सुरवसे आडवे पडले होते त्यांना सरळ करून समोरून मानेवरील कोयत्याने वार केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
नळदुर्ग परिसरामध्ये गुन्हेगारी मध्ये वाढ
मागील काही दिवसापासून नळदृग परिसरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे,परिसरात वाढलेली अवैद्य धंदे, याला कारणीभूत असल्याचे स्थानिक नागरिकांतून बोलले जात आहे. अशा घटनांमुळे परिसरामध्ये कायद्याचा धाकच नसल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी लक्ष देऊन परिसरातील गुन्हेगारीवर वचक ठेवावा अशी मागणी सुजाण नागरिकांतून होत आहे.
0 Comments