तुळजापूर : अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकरी संकटात
![]() |
तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथील शेतकरी संभाजी काळजाते यांच्या शेतातील अवकाळी पावसामुळे झालेली कांद्याचे नुकसान |
तुळजापुर /राजगुरु साखरे : यावर्षी मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने जोर धरला असून तुळजापूर तालुक्यातील अनेक उन्हाळी पीक उत्पादन करणारे शेतकरी संकटात सापडले असून परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
यावर्षी मे महिन्याच्या मध्यावधीपासूनच अवकाळी पावसाने जोर पकडला असून हा अवकाळी जोर दिनांक 2 जून पर्यंत राहणार असल्याचे काही हवामान तज्ञांनी सांगितले आहे त्यामुळे यावर्षी उन्हाळी कामापासून शेतकरी दूरच राहिला असून शेतीची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस वेळ देईल का नाही ? अशी शंका आता शेतकऱ्यांना येत आहे एवढे असतानाही या या अवकाळी पावसाच्या तडाख्यात मात्र कांदा उत्पादक शेतकरी सापडला आहे.उन्हाळी कांदा हा कांदा आता काढणीच्या वेळेस हा अवकाळी पाऊस जोर पकडल्याने हाताशी आलेला घास पूर्णपणे डोळ्यादेखत नष्ट होणार असल्याने या शेतकऱ्यांमध्ये निराशेची वातावरण दिसून येत आहे कारण उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असतानाही थेंब थेंब वाचून या कांदा पिकाला शेतकऱ्यांनी हाताच्या फोडाप्रमाणे जपले, वाढवले परंतु कांदा पीक आता काढणीला आला आहे. आणि त्यातच हा अवकाळी पाऊस जोर पकडला असून अनेक शेतकऱ्यांच्या कांदा पिकाच्या शेतामध्ये पाणीच पाणी दिसत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र दिसून येत आहे.
सध्या उन्हाळी कांदा काढणीला आला आहे त्यामध्येच अवकाळी पाऊस झाल्याने हा शेतात असलेला कांदा संपूर्णपणे खराब झाला आहे .माझ्या 1 हेक्टर 30 आर या क्षेत्रावरील कांदा पिक पूर्णपणे अवकाळी पावसामुळे भिजवून खराब झाले आहे . त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हे फार मोठे नुकसान आहे. यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी.
संभाजी काळजाते,शेतकरी चिवरी.
0 Comments