चिवरी परिसरात पावसाची उघडीप, शेतकरी चिंतेत, पाण्याअभावी पिके माना टाकु लागली
चिवरी/प्रतिनिधी राजगुरु साखरे : तुळजापूर तालुक्यातील चिवरी परिसरात मागील आठवड्यापासून पावसाने उघडीत दिल्यामुळे खरीप हंगामातील पिके कोमेजु लागली आहेत.परिसरात चालू हंगामात ऐन मृग नक्षत्रातच पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी आहे ज्या भागांमध्ये सुरुवातीस चांगला पाऊस झाला त्या भागातील शेतकऱ्यांनी वेळेत पेरण्या करून घेतले आहेत मात्र त्यानंतर पावसाने अचानक दडी दिल्याने परिसरातील अनेक भागातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
मृग नक्षत्रात येणारा हमखास पाऊस आणि त्यात केली जाणारी पेरणी हे एक वर्षांवर्षांचं समीकरण बनलं आहे मात्र यंदा मृग नक्षत्रात पावसाने ओढ दिल्याने तसेच सुटलेल्या वाऱ्यामुळे पीक पेरणीचे बारा वाजले आहेत. मृग नक्षत्रात बऱ्यापैकी पाऊस राहील अशी मोठी अशा शेतकऱ्यांना होती परंतु मृग नक्षत्रातच एकच पाऊस झाला त्यानंतर हवामान बदल झाला आकाशात ढग तर दिसत नाहीत मात्र सोसाट्याचा वारा मात्र सुरू झाला आहे.शेतकऱ्यांच्या मते हा वारा बंद होत नाही तोपर्यंत पाऊस येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागली आहेत. ८ जून पासून मृग नक्षत्र लागले या नक्षत्रात पेरणी झाल्या की,शेतकऱ्यांना चांगला हंगाम येतो असे जाणकार सांगतात त्यामुळे शेतकरी या नक्षत्रात पेरणी करण्यासाठी पावसाची वाट पाहत आहेत. मृग नक्षत्र संपून उलटले तरी आकाशात ढगही दिसत नाही व मृग छायाही पडली नाही .त्यात दिवसभर सोसाट्याचा वारा वाहत असून उन्हाचा पारा चढत असल्यामुळे जमिनीतील ओलावा खोल जात आहे. मे महिन्यात पावसाने बऱ्यापैकी हजरी लावल्याने जून महिन्यात ही पाऊस चांगला राहील व मृग नक्षत्रात पेरण्या होतील अशी अशा शेतकऱ्यांना होती परंतु पाऊस लांबत असल्यामुळे आता आद्रा नक्षत्राकडे शेतकऱ्याची लक्ष लागून राहिले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून पेरण्या केल्या पिके ही बऱ्यापैकी अंकुरली परंतु अचानक उन्हाचा पारा वाढल्याने व पिकांची पाण्याची तहान वाढल्याने पाण्याअभावी पिके कोमेजून जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता दुबार पेरणीची संकट येते की काय ?अशी चिंता सतावत आहे.
0 Comments