साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची लेखणी श्रमिकांना न्याय देणारी - प्रा राजा जगताप
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव - प्रा राजा जगताप
धाराशिव /प्रतिनिधी रुपेश डोलारे दि, २:, येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली, महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या हस्ते शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले, यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते मराठी विभाग प्रमुख प्रा राजा जगताप यांनी वरील प्रतिपादन केले, पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज हे अण्णाभाऊ साठे होते, प्रस्थापित साहित्यातील प्रियकराला प्रियसीच्या चेहऱ्यामध्ये चंद्र दिसायचा तो काळ होता तर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये भाकरीमध्ये चंद्र दिसत होता, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आपला आदर्श मानून अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून गावकूसाबाहेर रहाणाऱ्या समाजाला दिशा देण्याचे कार्य केले.
समाजात एक असे चित्र होते की,कापड गिरण्यांमध्ये मजूरी करणाऱ्या आपल्या माय माऊलीला अंगावर फाटके वस्त्र घालावे लागत होते,हा विरोधाभास त्यांना जाणवत होता, त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि अनुभव हेच त्यांच्या लेखनाचे बीज होते, त्यांनी लिहिलेल्या फकिरा आणि त्यातील फकिरा हे पात्र एका चळवळीचे प्रतिक होते.जात ,वर्ग , भाषा यापलीकडे जाऊन माणूसपणाला केंद्रस्थानी ठेवणारा त्यांचा विचार हा वैश्विक झाला, त्यांनी लिहिलेलं साहित्य हे परिवर्तनाचे अस्त्र आहे ही बाब आपण स्मरणात ठेवावी लागेल असा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला.कर्यक्रमाप्रसंगी कनिष्ठ विभागाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा सचिन चव्हाण,प्रा सुर्यवंशी यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरीष्ठ विभागाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ बालाजी गुंड यांनी केले तर आभार प्रा विवेकानंद चव्हाण यांनी मानले.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
0 Comments