महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जवळपास 30 लाखांचा अपहार , संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
तुळजापुर : येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील शाखा व्यवस्थापक सचिन राजाराम ईरीचे, टाकळी (राशीन) जिल्हा सोलापूर यांनी दिनांक 8.9.2022 रोजी 10.30 ते 29.03.2022 रोजी 17.30 या कालावधीमध्ये विविध कर्ज खात्यावर रकमेची बेकायदेशीरपणे आपल्या पदाचा गैरवापर करून रकमेची अफरातफर करून बँकेची एकूण 29,51,276 रु ची फसवणूक केली. अशा मजकुराचा महाराष्ट्र ग्रामीण बँक तुळजापूरचे शाखा व्यवस्थापक वैभव सदाशिव देशमुख यांनी दिलेल्या 27.03.2023 रोजी प्रथम खबरे वरून भारतीय दंड संहिता कलम,406,409,420 अंतर्गत तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवला आहे.
0 Comments