अखेर देवानेच न्याय दिला.... कोपर्डीतील पीडीतेच्या कुटुंबीयसह ग्रामस्थांच्या भावना
अहमदनगर : कोपर्डीतील गुन्ह्यात जरी आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेमुळे फाशी मिळाली नसली तरी देवाने न्याय केला असून त्यांनी स्वतःहूनच फाशी घेतली आहे. मात्र अद्याप दोन आरोपींना शिक्षा त्वरित मिळणे अपेक्षित आहे अशी अपेक्षा आज कोपर्डीतील नागरिकांनी व पिढी तिच्या कुटुंबियांनी व्यक्त केले आहेत. कोपर्डी अत्याचार व हत्या खंडातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेच्या आत्महत्येनंतर आज अनेकांनी समाधान व्यक्त करताना परमेश्वराचे आभार मानत एका नराधमाचा अंत झाल्याच्या भावना व्यक्त केल्या.माञ अद्यापही त्यांचे दोन सहकारी न्यायालयीन लढाई लढत आपल्या शिक्षेपासून दूर आहेत, त्यांनाही त्वरित शिक्षा मिळावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.
दि,१३ जुलै २०१६ रोजी कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून निघ्रण खुन करण्यात आला होता. सायंकाळी सातच्या सुमारास नववीत शिकणारी मुलगी आपल्या आजोबाच्या घरून मसाला घेऊन सायकल वरून घराकडे निघाली होती. त्यावेळी आरोपी शिंदे याने तिला अडवून तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर खून केला. तिचे दोन्ही हात मोडलेले आढळून आले होते आरोपी जितेंद्र शिंदे हा कोपर्डीतच रहिवाशी होता. तो गावातील वीटभट्टीवर कामाला होता, त्यांची आई वडील ही मजुरी करत होते. यामध्ये जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे, या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात खटला चालवण्यात आला. जिल्हा न्यायालयात निकाल लागला 29 नोव्हेंबर 2017 रोजी जिल्हा न्यायालय निकाल देत या तिन्ही आरोपींना खून आणि बलात्कारी आरोपी साठी फाशी शिक्षा सुनावली होती. आरोपींनीही या शिक्षेला वरील न्यायालयात आव्हान दिल्याने त्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी झालेली नव्हती. हे सर्व आरोपी पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होते, कोपर्डी प्रकरणातील आरोपींनी दिलेल्या फाशीच्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी व्हावी यासाठी कोपर्डी गावात व संपूर्ण महाराष्ट्रात अनेक वेळा आंदोलने झाली.
आत्ताही जालना जिल्ह्यात म्हणून मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना कोपर्डीतूनही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आली आहे. याही आंदोलनात आरोपींना तातडीने फाशी द्यावी ही मागणी करण्यात आली आहे. त्याच दरम्यान आज सकाळी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या मुख्य आरोपी जितेंद्रने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आली आहे. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेची आत्महत्या नंतर कोपर्डी गावातल्या नागरिकांमध्ये उशिरा का होईना पण न्याय मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. देवाच्या दारी नक्की न्याय मिळतो न्यायव्यवस्था आणि सरकार जरी या प्रकरणात तातडीने न्याय देऊ शकले नसले तरी मुख्य आरोपी शेवटी गळफासावर लटकलाच पण अद्यापही दोन आरोपी शिक्षेशिवाय आहेत. त्यांनाही लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे अशी भावना व्यक्त केली जात आहे, तर याच प्रकारचे भावना पीडितेच्या आईने व नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
-----------–--------------------------------------------------
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments