अखेर वाल्मिक कराड शरण! पुण्यातील सीआयडी ऑफीसमध्ये लावली हजेरी -
पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण व खंडणी प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मीक कराड यानं पुणे शहर पोलिसांना अखेर शरण आलेले आहे ती स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता. वाल्मीक कराड पुण्यात पोलिसांच्या स्वाधीन होताच पोलिसांच्या कार्यालयाबाहेर कराड याच्या समर्थकांची मोठी गर्दी जमली होती.
याबाबत त्यांनी एका व्हिडिओद्वारे पोस्ट केली आहे की,
केज पोलीस स्टेशनला माझ्याविरोधात खोटी खंडणीची तक्रार दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा जामीन अधिकार असताना मी पुणे येथील सीआयडी कार्यालयात सरेंडर करणार आहे. जे कोणी सरपंच संतोष भैय्या देशमुख यांच्या मारेकरी आहेत त्या मारेकऱ्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा करावी. या प्रकरणांमध्ये राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे. पोलीस तपासात जर काही सिद्ध झालं तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती शिक्षा भोगण्यास तयार आहे, असे सरेंडर होण्याआधी वाल्मीक कराड यांनी सांगितले आहे.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यात बीडच्या सुरक्षा व्यवस्थेची राज्यात चर्चा सुरू होती. विधानसभा अधिवेशनातही हा मुद्दा गाजला होता. गेल्या आठवड्यात बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाही निघाला होता. या प्रकरणामुळे विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर आरोपांचा सपाटा लावला होता. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग केला होता.
मसाजचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर 2024 रोजी याची अपहरण करून हत्या केली होती. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मीक कराड यानं आत्मसमर्पण केलेय. याप्रकरणातील पाचवा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. मागील तीन आठवड्यांपासून वाल्मीक कराड फरार होता त्यामुळे मुख्यमंत्र्याचे आदेशानुसार वाल्मीक कराड याचा शोध घेण्यासाठी सीआयडीने स्पेशल पथके तयार करून मागावर लावली होती, त्याशिवाय त्याचा पासपोर्ट आणि बँक खाती फ्रीज केली होती. त्यामुळे त्याचे सर्व बाजूने अडचणीत आल्यानंतर वाल्मीक कराड यानं शरण येण्याचा निर्णय घेतलाय.
वाल्मिक कराड शरण येणार याची बातमी सकाळी वाऱ्यासारखी व्हायरल झाली त्यामुळे त्यानंतर वाल्मक कराड याच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात सीआयडी कार्यलयाबाहेर गर्दी केली होती. वाल्मीक कराड हे आरोपी नाहीत. ते खंडणीचा त्यांच्यावर खोटा आरोप, गुन्हा दाखल केला असल्याचे समर्थकांचे म्हणणं आहे. बीड आणि अहमदनगरवरून आलेल्या समर्थकांनी सीआयडी कार्यालयाबाहेर गर्दी केली आहे.
0 Comments