Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यात पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट

राज्यात पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह  पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट


पुणे: मागील काही दिवसांपासून राज्यात सतत हवामानात बदल होताना दिसतोय कधी तीव्र उष्णता तर कधी मुसळधार पाऊस असे चित्र आहे.मुळात म्हणजे होळी नंतरच राज्यातील हवामान पूर्ण बदलली आहे होळी नंतर उष्णता वाढणार असे संकेत होते मात्र प्रत्यक्षात पूर्ण उलटे झाले काही महिन्यापासून राज्यात सतत अवकाळी पाऊस हजेरी लावत असताना दिसत आहे काही भागांमध्ये तर जोरदार गारपीट झाल्याने पिकांची मोठे नुकसान झाले. भर उन्हाळ्यात पाऊस सुरू असल्याचे चित्र बघायला मिळाले काही ठिकाणी पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाताना देखील दिसले, विदर्भ आणि मराठवाड्याला दोन दिवसापासून पावसाने झोडपून काढले आहे.

विदर्भात एकीकडे पाऊस तर काही शहरांमध्ये तापमानाचा नवा उच्चांक पाहायला मिळत आहे यंदा मान्सून लवकरच येणार असल्याची संकेत असून आता हवामान खात्याने मोठा अंदाज वर्तवला आहे राज्यात पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे यावेळी फक्त विदर्भ आणि मराठवाड्यातच नाही तर कोकण सोबत मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस हजेरी लावणार आहे.

राज्यात पुढील चार दिवस पावसाची हजेरी असणार आहे ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट होताना दिसते यंदा राज्यात भर उन्हाळ्यात पाऊस येताना दिसत आहे. कोकणातील मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही पुढील पाच दिवस काही ठिकाणी, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अहिल्यानगर जळगाव धुळे नाशिक या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट आहे. तर मराठवाड्यातील लातूर हिंगोली बीड नांदेड परभणी धाराशिव छत्रपती संभाजी नगर जालना या जिल्ह्यात काही भागात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याच्या पावसाचा इशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments