मौजे शिरगापुर येथील शेतकरी भिवाजी तात्याराव चव्हाण यांचा विजेचा धक्का लागून निधन.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""
शेतात काम करीत असताना मंगळवार दि.२७ मे रोजी सायंकाळी ४ वाजता घडली घटना.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (प्रतिनिधी):- तुळजापुर तालुक्यातील मौजे शिरगापुर येथील वारकरी सांप्रदायी कुटुंबातील अत्यंत मनमिळाऊ शेतकरी भिवाजी तात्याराव चव्हाण (वय ५८ वर्ष) हे मंगळवार दि.२७ मे २०२५ रोजी दररोजच्या प्रमाणे शेतीचे कामकाज करीत असताना अचानक विजेचा तीव्र धक्का बसल्याने त्यांचे निधन झाले.भिवाजी तात्याराव चव्हाण हे माळकरी कुटुंबातील अत्यंत सुस्वभावी मनमिळाऊ व धार्मिक स्वभावाचे होते त्यांच्या या आकस्मित अपघाती निधनाने शिरगापुर सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भिवाजी चव्हाण यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी नातवंडे व तीन भाऊ असा मोठा परिवार आहे. मौजे चव्हाणवाडी येथील रामायणाचार्य प्रवचनकार हभप. शिवाजी महाराज चव्हाण यांचे ते वडील बंधू होते.
0 Comments