Hot Posts

6/recent/ticker-posts

एक रुपयात पिक विमा योजना बंद ;सुधारित योजनेने शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढणार

एक रुपयात पिक विमा योजना बंद ;सुधारित योजनेने शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढणार


धाराशिव: मागील दोन वर्षापासून राज्यात सुरू असलेली एक रुपयाची पिक विमा योजना बंद करून त्या ऐवजी सुधारित पिक विमा योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे पूर्वी केवळ एक रुपयात शेतकऱ्यांना पिक विमा मिळायचा आता मात्र ही योजना बंद करण्यावर शासनाने शिक्कामूर्त केल्याने शेतकऱ्यांना आता पीक विमा हप्ता भरावा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड असणार असल्याने शेतकरी वर्गातून नाराजीचा सुर उमटु लागला आहे.

शेतकऱ्यांना पिकांना संरक्षण कवच म्हणून २०१३-१४ मध्ये पीक विमा योजना लागू करण्यात आली या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती पिकाचे नुकसान झाले असे शेतकऱ्यांना काही प्रमाणात मदत मिळू लागली पुढे २०१६ मध्ये त्याचे रूपांतर प्रधानमंत्री पिक विमा योजनेत झाल्यानंतर २०१३ पासूनचा शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी शासनाने एक रुपयात पीक विमा योजना लागू केली. त्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यावर मोठ्या प्रमाणावर कल वाढला या योजनेत राज्य व केंद्र शासनाचा हप्ता वाढल्याने शासनाच्या तिजोरीवरील भार वाढला आणि शेतकऱ्यांना कमी परतावे मिळू लागले याचा फायदा मात्र विमा कंपन्यांना जास्त होऊ लागला. आर्थिक अडचणीमुळे या योजनेसाठी दोनच निकष लागू करण्यात आले यापुढे पिक विमा परताव्यासाठी महसूल मंडळी हा तज्ञावर आधारित उत्पादन व पीक कापणी प्रयोगावर आधारित 50% चा निकष लागू केल्याने शेतकऱ्यांना परतावा कमी मिळण्याची शक्यता आहे

पिक विम्याच्या मदतीसाठी नवीन निकष लावण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान पोटी मिळणाऱ्या परताव्यावर याचा थेट परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. २९ एप्रिल २०२५ रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिक विमा संदर्भात निर्णयाला मान्यता देण्यात आली त्यानंतर ९ मे २०२५ रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून यंदाच्या खरीप हंगामासाठी व आगामी रब्बीसाठी ही नवीन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे शिवाय विमा भरूनही नुकसान भरपाई मिळण्याची कुठलीही निश्चित शाश्वती नसल्याने शेतकरी यापूर्वी विमा भरण्यासाठी उदासीन होते दरम्यान नवीन सुधारित पिक विमा योजनेनुसार शेतकऱ्यांना आता खरीप पिकासाठी विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के रब्बी पिकासाठी १.५% आणि नगदी पिकांसाठी ५% हप्ता भरावा लागेल ;तसेच आता केवळ पीक कापणी  प्रयोगाच्या आकडेवारीवर आधारित नुकसान भरपाई दिली जाईल. स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान यासारखे इतर निकष रद्द करण्यात आले. एकंदरीत  या एक रुपया पिकविमा योजनेच्या बंदीवर  शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे 

सुधारित विमा योजना सुरू

शासनाकडून एक रुपया पिक विमा योजना बंद करून यामध्ये नवीन सुधारित योजना सुरू करण्यात आली आहे शासनाच्या पुढील सूचनेनुसार शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून विमा भरण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल पिकांना संरक्षण म्हणून विमा भरणे गरजेचे असल्याने तालुका कृषी अधिकारी  यांनी सांगितले.

विमा कंपनीकडून सतत लूट

विमा कंपनी शेतकऱ्यांची सतत लूट करत आली आहे शेतकऱ्यांनी विमा भरल्यावर ही झालेल्या नुकसानीचा शेतकऱ्यांना पुरेपूर कधीच मोबदला मिळाला नाही आता शासनाने एक रुपयात पीक विमा योजना बंद केल्याने शेतकऱ्यांना विमा भरताना भर दंड बसणार आहे विमा भरल्यावरील विमा कंपनीचे जाचक अटी व निकषामुळे शेतकऱ्यांची मोठी डोकेदुखी वाढली आहे शिवाय विमा कंपनीचे दलाल शेतकऱ्यांची मोठी लूट करीत असल्याचे शेतकरी अजय देशमुख यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments