Hot Posts

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा, दलित मुस्लिम समाजावरील हल्ले रोखण्यासह विविध मागण्यासाठी आंदोलन

वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा, दलित मुस्लिम समाजावरील हल्ले रोखण्यासह विविध मागण्यासाठी आंदोलन


प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद


धाराशिव दि.४ (प्रतिनिधी) - दलित, मुस्लिम अल्पसंख्यांक यांच्यावर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.३ जुलै रोजी जनअक्रोश मोर्चा काढण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, जरिनखानचा, पोलीस कोठडीत खुन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीस तात्काळ अटक करुन बडतर्फ करण्यात यावे. तर जरिन खानच्या कुटुंबास ५० लाखाची शासकीय आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच नांदेड जिल्ह्यातील बोंडार येथील अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच परळी तालुक्यातील कदम कुटुंबावर जिव घेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना कडक शासन करण्यात यावे. तर लातूर तालुक्यातील रेणापूर येथील मातंग बांधवाचा खुन करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. त्याबरोबरच

धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील फय्याज पठाण यांच्या आत्महत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून कडक शासन करण्यात यावे आदी मागण्यांसाठी हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने काढण्यात आलेला जनअक्रोश मोर्चा हा फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या जातीवादी दंगली व दलित, मुस्लीम, अल्पसंख्यांक यांच्यावर होणाऱ्या आत्याचारामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत चाललेली आहे. अशा घटना रोखण्यासाठी वंचित आघाडीचे सर्वेसर्वा ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार मोर्चा काढून या घटनांचा निषेध करण्यात आला. तर अशा घटना पुढील काळात घडू नयेत यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून निघून तो छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, जिल्हा न्यायालय मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी मोर्चेकऱ्यांना उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तर या मागण्याचे निवेदन शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जर होणारे अन्याय अत्याचार थांबले नाहीत तर संपूर्ण राज्यात रस्त्यावर उतरून सरकारला सळो की पळो करून सोडणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा प्रवक्ते फारूख अहमद, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे-पाटील, उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल, जिल्हा प्रभारी ऍड रमेश गायकवाड, जिल्हाध्यक्ष बी.डी. शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा लोखंडे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शितल चव्हाण, उपाध्यक्ष अमोल लांडगे यांनी केले. यावेळी जिल्हा महासचिव बाबासाहेब जानवराव, धनंजय सोनटक्के, उपाध्यक्ष ऍड. लक्ष्मण खुने, सुशिल बनसोडे, जिल्हा संघटक विनोद अंबेवाडीकर, सहसचिव सोमनाथ नागटीळक, जिल्हा प्रवक्ते डॉ. शहाजी चंदनशिवे, भाऊसाहेब अंदुरकर, कुंदन वाघमारे, शेखर बनसोडे आधी सह महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


या मोर्चात आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, जय भीम जय भीम, वंचित बहुजन आघाडीचा, प्रकाश आंबेडकरांचा विजय असो अशा गगनभेदी घोषणा दिल्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. तर मोर्चाच्या मधोमध हातामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिज्ञा असलेला फोटो सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता.

Post a Comment

0 Comments