शेअर मार्केटमध्ये पैसे दुप्पट करून देतो म्हणत शेतकऱ्यांची तीन कोटी 37 लाखाची फसवणूक-
सोलापूर : शेअर मार्केटमध्ये पैसे दुप्पट करून देतो असेच सांगून करमाळा तालुक्यातील घोटीतील दिसून अधिक शेतकऱ्यांची गावातीलच तरुणांनी आर्थिक गुंतवणुकीची आमची दाखवून तब्बल तीन कोटी 37 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
करमाळा तालुक्यातील घोटी येथील रेवननाथ ननवरे (सध्या राहणार मांजरी बुद्रुक जिल्हा पुणे ) यांनी फसवणुकीनंतर पळ काढण्याची तक्रार शेतकऱ्यांनी पोलिसात दिली आहे .30 मे 2024 पासून हा फसवणुकीचा प्रकार सुरू होता या प्रकरणी बाळासाहेब पोपट राऊत राहणार (घोटी ता. करमाळा) यांच्यासह तीस पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी तक्रार दिली आहे. सोमवारी रात्री याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ननवरे यांनी आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली असून तेव्हापासून तो गायब आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले तो फसवणूक करून निघून गेला असून त्याचा शोध घ्यावा अशी तक्रार शेतकऱ्यांनी पोलिसात केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की रेवनात हा आयटी इंजिनियर म्हणून नोकरीला आहे शेअर मार्केटमध्ये त्यांनी कोट्यावधीची रक्कम गुंतवल्याची भासवले त्यात लाखो रुपयाचा परतावा मिळत असल्याचे दाखवले शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास लोकांना तयार केली. गावातील व आसपासच्या शेतकऱ्यांनी स्वतः मित्र नातेवाईक यांच्याकडून लाखो रुपये गोळा करून दिले सुरुवातीला काहींना परतावाही दिला मात्र नंतर परतावा व मुद्दल रक्कम दोन्ही रकमा देण्यास टाळाटाळ करू लागला यावरून फसवणूक होत असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले त्यांनी पैशाचा तगादा लावल्यानंतर रक्कम देतो असे सांगितले दरम्यान नन्नवरे यांनी आपली गाडी उजनी धरणाजवळ भीमा नदी पुलावर लावली. गाडीत आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहिली अशी माहिती शेतकऱ्यांनी टेंभुर्णी येथून नऊ ऑगस्ट ला सायंकाळी कळाली पण अद्याप ननवरेचा काहीच तपास लागलेला नाही.
0 Comments