Hot Posts

6/recent/ticker-posts

एमबीबीएसला चारदा नापास., नैराश्यातून भावी डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या|Ēmabībī'ēsalā cāradā nāpāsa., Nairāśyātūna bhāvī ḍŏkṭaracī gaḷaphāsa ghē'ūna ātmahatyā

 एमबीबीएसला चारदा नापास., नैराश्यातून भावी डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या 


बीड: एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात चार वेळा अनुउत्तीर्ण झाल्याच्या नैराशातून आकाश संतोष जोगदंड( राहणार चौसाळा जिल्हा बीड) या तरुणांनी सोलापूर येथील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सोलापूर येथील सावरकर मैदानाजवळील एका हॉटेलच्या खोलीत दि, ५ जून रोजी हा प्रकार उघडकीस आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की सोलापूर येथील डॉ.वैशंपायन शासकीय महाविद्यालयात आकाशने 2020 मध्ये प्रवेश घेतला होता, एप्रिल मे मध्ये प्रथम वर्षातील शेवटची संधी असल्यालेली परीक्षा देऊन तो गावी गेला. या परीक्षेचा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निकाल लागला, या चौथ्या संधीतही अनुत्तीर्ण झाला. त्यामुळे आकाश नैराश्यात होता. चार ते पाच दिवसांपूर्वी तो गावाकडून सोलापूरकडे आला, मात्र कॉलेजच्या हॉस्टेलकडे तो गेला नाही, तो हॉटेलमध्येच राहिला मित्र फोन करत होते त्यावेळी तो गावी असल्याचे सांगत होता.

आत्महत्या करण्यापूर्वी आकाशने चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यामध्ये ' आईच्या विश्वासाला पात्र ठरलो नाही , आई काळजी घे, बहिणीचा नीट सांभाळ कर, माझ्या मृत्यूची वार्ता अगोदर माझे मामा व मित्रांना द्या . कारण आई व बहिणीला धक्का बसेल माझ्या मृत्यू कोणालाही जबाबदार धरू नये., असे मृत्यूपूर्वी आकाशने चिठ्ठीत लिहून ठेवले होते.

तोंडाला कागद अन् चिकटपट्टी

  1. चिठ्ठीत मामा व मित्रांचे संपर्क क्रमांक दिले होते , गळफास घेण्यापूर्वी तोंडाला कागद त्यावर चिकटपट्टी लावली
  2. गळ्याला नायलॉनचा दोर रुतु नये म्हणून रुमालीही लावला होता, हॉटेलच्या खोलीतील लोखंडी हुकला दोरी बांधून त्यांनी गळफास घेतला.
  3. सोमवारी सकाळी बराच वेळ झाला तरी आकाश खोलीच्या बाहेर आला नाही म्हणून हॉटेल चालकांनी पोलिसांना माहिती दिली.
  4. मयत आकाश हा एकुलता एक होता त्याच्या मागे वडील व आई बहिण असा परिवार आहे
परीक्षेची पाचवी संधी

एनएमसीच्या नियमानुसार मेडिकल मध्ये चार वेळा नापास झाल्यास प्रवेश रद्द केला जातो, या धास्तीमुळे आकाश तणावत होता. मात्र दोन दिवसांपूर्वी एन एम सी च्या नियमांमध्ये बदल करण्यात आला होता त्यानुसार पाचव्यांदा ही विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. पण कदाचित नव्या नियमाची माहिती नसल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे अशी चर्चा वर्ग मित्रांमध्ये होती.

Post a Comment

0 Comments