विजेच्या धक्क्याने वडिलांसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू, जालना तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील दुर्दैवी घटना
जालना : जालना तालुक्यातील वरुड येथे मंगळवारी दिनांक 10 रोजी दुपारी विजेच्या धक्क्यांनी वडिलांसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैव मृत्यू झाला यामध्ये विनोद तुकाराम मस्के वय (30) त्यांची मुलगी श्रद्धा म्हस्के वय (12) व मुलगा समर्थ मस्के वैद्य अशी मृतांची नावे आहेत वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की विनोद मस्के हे मंगळवारी सकाळी शेतात मल्चिंग पणे अंथरण्याचे काम करत होते मुलगी श्रद्धा व मुलगा समर्थ काही अंतरावर खेळत होते मल्चिंग अंथरत असताना विनोद यांना उघड्या वायरमधून गेलेल्या विजेचा जबरदस्त शॉक बसला त्यावेळी वडिलांना पिण्यासाठी पाणी घेऊन आलेली दोघे चिमुकले वडिलांच्या मदतीसाठी धावली मात्र त्यांचाही विजेच्या प्रवाहाला स्पर्श झाला त्यामुळे वडील मुलगी व मुलगा जागीच मृत्यू झाला. बराच वेळ होऊनही मुले घरी परत आली नाही म्हणून विनोद यांची पत्नी शेतात गेली असता समोरचे दृश्य पाहून त्यांनी हंबरडा फोडला त्यानंतर आजूबाजूचे शेतकरी घटनास्थळी धावली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता स्थानिक नागरिकांनी तिघांनाही जालना शहरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. त्यानंतर तिघांची मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा जालना सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आईने वटसावित्री सणाच्या दिवशी या दुर्दैवी घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरले आहे.
0 Comments