Hot Posts

6/recent/ticker-posts

वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथे पवनचक्की उभारणीच्या जागेच्या प्रकरणावरून पोलिसांकडून शेतकऱ्यांना अमानुष मारहाण

वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथे पवनचक्की उभारणीच्या जागेच्या प्रकरणावरून पोलिसांकडून शेतकऱ्यांना अमानुष मारहाण


धाराशिव/ प्रतिनिधी रुपेश डोलारे: वाशी तालुक्यातील तांदूळवाडी येथील एका शेतकऱ्यास पोलिसांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली आहे या शेतकऱ्याने पवनचक्कीच्या जागेचा योग्य मोबदला मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केली असता त्यांना त्यांच्या शेतातील उसाने मारहाण केल्याचा दावा प्रत्यक्ष दर्शनी केला आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथील गणेश शेरकर यांच्या शेतात पवनचक्की उभारणीचे काम सुरू आहे मात्र त्यांच्या शेजारी झालेल्या दुसऱ्या कंपनीने शेजारी शेतकऱ्याला चांगला मोबदला दिला तसाच मोबाईलला मिळण्याची मागणी शेरकर यांनी केली मात्र कंपनीने पोलीस बळाचा वापर करून मारहाण केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शेरकर यांच्यासोबत काही स्थानिक सत्ताधारी राजकीय पुढार्‍यांनाही पोलीस उपाधीक्षक स्वप्निल राठोड यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यासह मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे .यावरून पोलीस सामान्याच्या रक्षणासाठी आहेत का? कंपनीचे हितासाठी असाच सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. मागील एक वर्षापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये पवनचक्की कंपनीचे कर्मचारी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून शेतकऱ्यावर दादागिरी करून कमी मोबदला देऊन पवनचक्की उभारणीचे कामे करत असल्याचे शेतकरी वर्गातून सांगितले जात आहे मात्र याकडे ना सरकारची लक्ष,ना प्रशासनाचे त्यामुळे शेतकऱ्याला आता कुणी वाली आहे का नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पवनचक्कीच्या विद्युत लाईन टॉवरसाठी गणेश शेरकर यांच्या शेतजमिनीवर काम सुरू आहे. शेरकर यांच्या शेतातून दोन टॉवर वेगवेगळ्या कंपनीचे गेले आहेत. “जेवढा मावेजा एका कंपनीने दिला, तेवढाच दुसऱ्या कंपनीनेही द्यावा” अशी मागणी केली होती. योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी संबंधित टॉवरचे काम थांबवत निषेध व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत, संबंधित कंपनीने शेतकऱ्यांशी संवाद साधण्याऐवजी पोलिसांना घटनास्थळी बोलावलं. त्यानंतर पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला. यामध्ये काही शेतकऱ्यांना मारहाण झाल्याची माहिती असून यामुळे ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, या घटनेनंतर वाशी पोलीस स्टेशनमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होते, शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे न्यायाची मागणी करत लेखी तक्रार दिली आहे मात्र या घटनेकडे पोलीस प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार की पवनचक्की कंपनीच्या पाठीशी उभे राहणार? हे पाहावे लागणार आहे .

या सगळ्या प्रकरणावर आता धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी घटनेचा निषेध करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. रझाकार आणि निजामांची कार्यपद्धती तंतोतंत अशीच होती, असं म्हणत कैलास पाटलांनी शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीचा निषेध केला. त्यांनी पोलिसांचा उल्लेख खाकी वर्दीतील गुंड असाही केला.


बातमीचा संपूर्ण व्हिडिओ पहा

👇👇👇👇👇👇👇 

https://youtu.be/zwJ6QA6tuAM?si=rD22kxn2hKs9Iexx

Post a Comment

0 Comments