तुळजापूर तालुक्यातील बोगस मुन्नाभाई डॉक्टरांवर कारवाई होत नसल्याने अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील करणार आत्मदहन
तुळजापूर प्रतिनिधी/रूपेश डोलारे : तालुक्यामध्ये सर्रासपणे बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू आहे. रूग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या मुन्नाभार्इंवर आरोग्य विभागाकडून मात्र ठोस कारवाई होताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे ग्रामीण भागात फिरत्या बोगस डॉक्टरांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे आता या बोगस डॉक्टरांना आवर घालणे हा आरोग्य विभागासमोर मोठा प्रश्न आहे.वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही नियमानुसार परवानगी अथवा डिग्री नसताना हे बोगस डॉक्टर गोरगरीब रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळत आहेत. हा सर्व प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. परंतु याबाबत संबंधित प्रशासकीय यंत्रणा मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे
तुळजापूर तालुक्यातील बोगस मुन्नाभाई वर अनेक वेळेस आंदोलन,करून पण जाणीवपूर्वक प्रशासनाकडून कारवाही होत नसल्यामुळे तसेच बोगस मुन्नाभाईला आरोग्य प्रशासन पाठीशी घालत असल्यामुळे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या वतीने दिनांक 20 जून रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तुळजापूर येथे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर यांच्या आदेशावरून जिल्हाध्यक्ष गणेश पाटील हे आत्मदहन करणार आहेत .
याबाबत अधिक माहिती अशी आहे की गेले अनेक वर्षापासून बोगस डॉक्टर विरोधात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ही आंदोलन करत असून पदवी नसताना बोगस मुन्नाभाई अनेक उपचारावर औषध उपचार करून तालुक्यातील जनतेची फसवणूक करत आहेत .त्याचबरोबर आरोग्य प्रशासनाकडून बेकायदेशीर चालणाऱ्या तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर तत्काळ कारवाई करू अशा प्रकारचे लेखी पत्र देऊन पण अद्यापही कारवाई होत नाही .तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील डॉ राजेंद्र लबडे यांनी बोगस दवाखाना चालवून उपचारासाठी आलेली 24 वर्ष रुग्णाबरोबर अत्याचार केला होता .आशा डॉक्टरला कोणाच्या आशीर्वादामुळे परवानगी दिली तसेच अत्याचाराचा गुन्हा दाखल होऊन पण पुन्हा क्लिनिक कसं सुरु असा प्रश्न असून या सर्वांवर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती भ्रष्ट अधिकाऱ्यांना जागा करण्यासाठी अनुक्या पद्धतीने म्हणजेच आत्मदहन करणार आहे यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन सदर वीस जून रोजी हे आत्मदहन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे या निवेदनावर जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांची स्वाक्षरी आहे .
0 Comments