मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे(Gram panchayat By Election) पडघम वाजले असल्याचे निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे. राज्यभरातील सुमारे २ हजार ६२० ग्रामपंचायतीतील ३ हजार ६६६ सदस्य आणि १२६ थेट सरपंचांच्या रिक्तपदांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. १८ मे २०२३ रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे.
निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होत आहे.
निवडणूक कार्यक्रम असा असणार
२५ एप्रिल ते ०२ मे २०२३ दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी अर्ज दाखल करता येणार नाहीत.
३ मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ८ मे २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
१८ मे २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल.
नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. १९ मे २०२३ रोजी मतमोजणी होईल.
0 Comments