Hot Posts

6/recent/ticker-posts

लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं,जामिनासाठी न्यायाधीशांनीच घेतली पाच लाख रुपायांची लाच सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई



सातारा प्रतिनिधी: सामान्य नागरिक आपल्यावरील अन्याय किंवा अत्याचारविरुद्ध दाद मागण्याचे शेवटचे ठिकाण म्हणजे न्यायालय अर्थात न्यायव्यवस्था. लोकशाही प्रक्रियेत न्यायव्यवस्था ही स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात असल्याने प्रशासन आणि राजकीय दबाव, कुठल्याही अन्याय विरुद्धची लढाई देखील मोठ्या आशेने न्यायालयात लढली जाते. मात्र चक्क न्यायाधीश महोदयांनाच एसीबी पथकाने पकडल्याने जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून न्यायाधीश महोदयांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडली आहे. यामुळे, सर्वसामान्यांच्या न्याय-हक्काचं शेवटचं आश्वासक ठिकाण असलेल्या न्यायव्यवस्थेवरील विश्वासाला देखील या घटनेनं तडा गेला आहे.
 
गुन्हा कोणताही असो, सामान्य नागरिकाचे न्याय मिळण्याचे एकमेव ठिकाणी म्हणजे न्यायालय. पण, या न्यायव्यवस्थेतही भ्रष्टाचाराची वाळवी घुसली आहे. फिर्यादीच्या वडिलांच्या एका प्रकरणात जामीन मिळवून देण्यासाठी चक्क न्यायधीशांनीच तब्बल पाच लाख रुपयांची लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश  धनंजय निकम यांच्यासह इतर तीन जनावर गुन्हा दाखल झाला आहे. एसीबी पथकाने केलेल्या कारवाईवरुन हा गुन्हा दाखल झाल्याचे समजते. सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करुन देण्याबाबतचे हे प्रकरण आहे.

पुणे-सातारा  लाच लुचपत प्रतिबंधक  विभागाने संयुक्तिकपणे साताऱ्यात मोठी कारवाई केली आहे. सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश महोदयांविरुद्धच गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले, त्यानंतर गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई सुरू हे. पाच लाख रुपयांच्या लाच प्रकरणात न्यायाधीश महोदयांसह तीघांना रंगेहात पकडल्याने न्यायपालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे.


अपहर व फसवणूक गुन्ह्यातील फिर्यादी वडिलांना जामिन देण्यासाठी पाच लाखांची मागणी करण्यात आली होती, अशी एसीबी कडून माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच या घडामोडी घडल्या आहेत. येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून अँटीकरप्शनच्या पोलिसांनी सर्वांना रंगेहात पकडले, त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेने  जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे. ज्या न्यायपालिकेवर सामान्य माणसांचा शेवटचा विश्वास असतो, त्याच न्यायव्यवस्थेवरही या कारवाईनंतर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.


दरम्यान, ज्या सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास हा न्यायव्यवस्थेववर आहे, पोलिस यंत्रणांकडून अन्याय झाला तरी न्यायालयात आपणास दाद मिळेल, न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेल्या न्यायमूर्तींकडून आपल्यावरील अन्याय दूर होईल, अशी सर्वसाधारण भावना असते. मात्र, चक्क न्यायपिठासनावर बसणारा न्यायाधीश महोदयच लाच घेताना आढळून आल्याने विश्वास कुणावर ठेवायचा असा गंभीर प्रश्न  उपस्थित झाला आहे. पोलीस, व प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या घटना सातत्याने समोर आल्या आहेत. पण,थेट न्यायव्यवस्थेतील वरिष्ठ अधिकारीच एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments