तुळजापूर तालुक्यात मागील आठवड्यापासून पावसाची संततधार, शेत मशागतीची कामे ठप्प अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित
तुळजापूर प्रतिनिधी: तालुक्यात मागील आठवड्यापासून आज पर्यंत वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह धुवाधार पाऊस सलग आठवडा पासून बॅटिंग करत आहे त्यानंतर ही आभाळ दाटून येत असल्याने रात्री पुन्हा होणार हे मात्र वास्तव चित्र आहे. दररोज आभाळ भरून येत असल्याने पाऊस कधी थांबेल हे सांगणे आभाळाकडे पाहून तर कोणालाच शक्य नाही गेल्या आठवड्यात गारांचा पाऊस झाला त्यानंतर चार दिवसापासून पाऊस सुरू आहे पुन्हा पाऊस झाला तर फळबाग भाजीपाला आंब्याच्या बागा उन्हाळी पिके सुपडा साफ होईल या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
येत्या 30 मे पर्यंत धुवाधार पाऊस पडणार असल्याचे हवामान तज्ञ पंजाबराव डक सांगत आहेत 30 मे पर्यंत पाऊस सुरू राहिला तर पुढे ७ जूनला मृग नक्षत्राच्या आगमन होणार आहे. सध्याच्या पावसावर पेरणी करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे सध्या पेरणीचे दिवस जवळ आले आहेत शेती मशागतीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे पाऊस कधी उघडेल यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळातील ढगाकडे लागले असून अवकाळी पाऊस मृगापर्यंत पडला तर पेरणीपूर्वीची मशागत न करता खरिपाच्या पेरणीसाठी चाड्यावर मोठ आवळावी लागते की काय? अशी भीती शेतकऱ्याच्या मनात निर्माण झाली. अवकाळी पावसाचा बाजारपेठेवरही मोठा परिणाम झाला असून बाजारपेठेतील रस्ते सुनसान झाले आहेत तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब कोसळून पडल्याने वीजपुरवठा सुद्धा खंडित झाल्याचे दिसून येत आहे .ढगाळ वाद असलेले वातावरणात दिवसेंदिवस चांगलाच बदल होत असून थंडगार हवा ,काळे कुठ्ठ ढग जमा होत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना हा पाऊस कधी उघडेल? अशी चिंता सतावत आहे.
0 Comments