विद्यार्थ्यांनी वाढत्या वयानुसार आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी--श्री सुज्ञान कांबळे सर
तुळजापूर : वाढत्या वयानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज असून जीवन जगण्यासाठी काही रहस्याबाबत त्यांनी आपल्या चाळीस वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.मंगरूळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील जिल्हा परिषद प्रशालेतील इयत्ता दहावी सन 1982 /83 व 1983/ 84 या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा बुधवार दिनांक 28 मे 2025 रोजी मंगरूळ येथे संपन्न झाला त्या स्नेह मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले.
तब्बल 40 वर्षानंतर या दोन्ही बॅचचे वर्ग मित्रांनी आज या स्नेह मेळाव्यानिमित्त एकत्र आले होते या स्नेह मेळाव्यानिमित्त एकत्र आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांना आलिंगन देऊन मिठी मारली अरे आपण किती वर्षांनी भेटत आहोत तू कसा आहेस आणि एकमेकांनी आपल्या आपल्या प्रपंचाचे व परिवाराची सदस्यांची विचारपूस केली आपण त्याबाबत ही सर्वांनी एकमेकांची माहिती जाणून घेतली आपल्या विचाराची देवाण-घेवाण केली या भेटीनंतर सर्व मित्रां मध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते आणि लहानपणीच्या आपल्या शालेय जीवनातील काही प्रसंग हे याप्रसंगी काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.सत्यवान शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून मंगरूळ जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक राठोड सर, 83/84 या बॅचच्या विद्यार्थ्यांचे गुरुवर्य आणि आदर्श व्यक्तिमत्व कांबळे सर, श्रीमती मंदाकिनी साबळे मॅडम, सुदर्शन शिंदे सर आणि 1984 बॅचच्या विद्यार्थिनी उमाताई महाबोले यांचे पती डांगे सर हे होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश खोपडे सर यांनी केले आणि उमाताई महाबोले यांनी सन्मान पत्राचे वाचन केले तर संजय धुरगुडे, नागनाथ वडणे नितीन मेहता विठ्ठल वडणे सत्तार मुलांनी खंडू रोकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.लक्ष्मी साठी मॅडम यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल याप्रसंगी त्यांचाही सन्मान करण्यात आला.
या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमास मार्गदर्शन करताना साबळे मॅडम म्हणाल्या की या मंगरूळ गावात शाळेत अध्यापनाचे कार्य करत असताना मला बरेच काही शिकायला मिळाले आणि माझ्या अध्यापनामुळे शिक्षण क्षेत्रात मी विविध पदावर उंच भरारी घेतली ती मी केव्हाही विसरणार नाही असे म्हणत याच शाळेत अध्यापन करणारे मंदाकिनी साबळे मॅडमचे पती कै.दादाराव साबळे यांच्या आठवणीने त्यांचा कंठ दाटून आला त्याप्रसंगी हॉलमध्ये सर्वजण स्तब्ध झाले
तसेच 1984 च्या बॅचच्या विद्यार्थिनी उमादेवी महाबोले यांचे आई-वडील या शाळेत अध्यापनाचे कार्य करत होते मात्र ते या जगात नसून त्यांच्या आठवणी ने उमादेवी महाबोले यांचे अश्रू अनावर झाले,यावेळी जब्बार शेख सर लिखित "जीवनवेल"या आत्मचरित्र च्या प्रती सर्व गुरुवर्य आणि वर्ग मित्रांना भेट म्हणून देण्यात आले.
याप्रसंगी सतीश खोपडे, नागनाथ वडणे , अनिल डोंगरे, संजय धुरगडे, जब्बार शेख, सुधाकर पाटील, विठ्ठल जेठीथोर, हुसेन मुलाणी, सोमनाथ बचाटे, राजेंद्र माशाळकर, सुधाकर डोंगरे, संभाजी खोपडे, सत्तार मुलाणी, प्रभाकर काळे, वसंत पठाडे, नागनाथ माळगे, संजय लोहार, सुरेश हजारे, दिलीप धुरगुडे, विश्वनाथ जेटीथोर, जयपाल जांभळे, राजेंद्र लबडे, विठ्ठल वडणे, मनोज जोशी, संभाजी ( सुहास) डोंगरे, निलेश बचाटे, रत्नाकर उपासे,यशवंत सरडे ,चंद्रकांत कदम, सुदर्शन तांबे, नागनाथ सापते, सूर्यकांत तांबे,किरण मेहता, विकास दुलंगे, गजानन कुलकर्णी, उत्तम शिंदे, रविंद्र बराटे, श्रीकृष्ण शिरसागर, उमाताई महाबोले, इंदुमती वाळके, जगदेवी भडंगे, लक्ष्मी सरडे मॅडम, लालसिंग राजपूत, शहाजी पावले, गंगाधर बनसोडे, हनुमंत पाटील, मारुती यमगर,आदि विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशिष साठे, जब्बार शेख, विठ्ठल जेठीथोर, यांनी केले तर शेवटी संजय धुरगडे यांनी आभार मानले.
0 Comments