Hot Posts

6/recent/ticker-posts

शंभर टक्के अनुदानावर बियाणे व पीक प्रात्यक्षिकासाठी अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन-Mahdbt Farmer sceme

शंभर टक्के अनुदानावर बियाणे व पीक प्रात्यक्षिकासाठी अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन-Mahdbt Farmer sceme 


धाराशिव: राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत तुर, मूग उडीद व सोयाबीन पिकांच्या अनुदानावरील बियाणे व पीक प्रात्यक्षिकासाठी गुरुवारपर्यंत दिनांक 29 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आली आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदलाचे महत्त्व विचारात घेता सुधारित संकरित वाणांच्या प्रसाराच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे वितरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रमाणित बियाणे वितरण या घटकापर्यंत आर्थिक साह्य प्रति शेतकरी किमान 0.20 हेक्‍टर ते कमाल एक हेक्टर पर्यंत मर्यादा आहे शेतकऱ्यास महाबीज वितरकामार्फत सातबारा उताऱ्याच्या आधारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येणार आहे.

तूर, मूग ,उडीद दहा वर्षाच्या आतील सुधारित प्रमाणित बियाणे वाणास 50 रुपये किलो प्रमाणे अनुदान असून दहा वर्षाच्या वरील सुधारित प्रमाणित बियाणे वाणास 25 रुपये किलो प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. तूर मूग उडीद या पिकांच्या अनुदानावरील बियाणेसाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही तसेच राष्ट्रीय खाद्यतील अभियान अंतर्गत सोयाबीन बियाणे पाच वर्षाच्या आतील वाण फुले किमया शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध केले जाणार आहे यासाठी महाडीबीटी पोर्टलवर 26 मे ते  29 मे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे 29 मे हा आजचा शेवटचा दिवस आहे, तसेच 29 मे रोजी सायंकाळी ज्या शेतकऱ्याची निवड झाली आहे त्यांना मोबाईलवर संदेश पाठवले जातील व यादी प्रसिद्ध होईल. अनुदानावरील बियाणे साठी निवड झालेल्या लाभार्थ्यांनी महाबीज  वितरकामार्फत 30 मे पासून बियाणे उचल करावे अशी आव्हान करण्यात आली आहे.

इथे करा नोंदणी

वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी जास्तीच्या शेतकरी यांनी महाडीबीटी च्या अधिकृत संकेतस्थळावर   29 मे पर्यंत अर्ज सादर करावेत तसेच याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्याशी संपर्क साधावा

Post a Comment

0 Comments