पोटच्या मुलाला विष पाजून खून केल्याप्रकरणी मयत बापावर खुनाचा गुन्हा दाखल, धाराशिव तालुक्यातील बावी येथील सामूहिक आत्महत्या प्रकरण
⛔धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे : तालुक्यातील बावी येथील एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक १६ जून रोजी सकाळी उघडकीस आली होती या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथे आकस्मित मृत्यू म्हणून नोंद झाली होती. पोलिसांच्या तपासात व शवविच्छेदन अहवालावरून दोन वर्षीय पोटच्या लेकराला विष पाजुन मारल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मयत बापावर दिनांक १९ जून रोजी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सी.एस बनसोडे यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अधिक पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धाराशिव तालुक्यातील बावी येथे एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाला होता ही घटना दिनांक १६ जून रोजी सकाळी उघडकीस आली होती.धाराशिव तालुक्यातील बावी येथील लक्ष्मण मारुती जाधव वय (28)वर्षे या तरुणाला ऑनलाइन गेम चे व्यसन लागले होते . त्यामध्ये तो कर्जबाजारी झाला होता त्याच्या डोक्यावर वाढलेली कर्ज फेडण्यासाठी लक्ष्मण जाधव यांनी त्याच्या हिश्याची जमीन विकली होती तसेच त्यांच्या हिश्याचा प्लॉट ही विकला होता तरीही त्याचे कर्ज फिटले नव्हते त्यामुळे लक्ष्मण जाधव हे नैराश्यात गेले होते.त्यांनी गावातील मुलीशी तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता असे सांगण्यात येते त्यांना दोन वर्षे वयाचा शिवांश मुलगा होता लक्ष्मण जाधव व त्याची पत्नी तेजस्विनी जाधव या दोघांनी दिनांक 15 जून रोजी रात्रीच्या सुमारास आत्महत्या करून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.या दोघांनी नैराश्यातून विषारी औषध प्राशन केले दोघांनी विनिमय करून विषारी औषध पीले व लक्ष्मण जाधव यांनी स्वतःचा मुलगा शिवांश लक्ष्मण जाधव वय २ वर्षे यास टफगोर नावाचे विषारी औषध पाजून त्याचा खून केला लक्ष्मण जाधव आणि त्याची पत्नी तेजस्विनी व मुलागा शीवांश दोघे मयत झाल्याची खात्री झाल्यानंतर स्वतः घरातील लोखंडी आडुला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद झाली होती पोलिसांनी केलेल्या चौकशीवरून माहीत लक्ष्मण जाधव यांनी त्याचा मुलगा शिवांश याचा विष पाजुन खून केल्याची तपासात निष्पन्न आढळून आल्याने पोलीस उपनिरीक्षक सीएस बनसोडे यांनी दिनांक 19 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरे वरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
0 Comments