Hot Posts

6/recent/ticker-posts

तामलवाडी एमआयडीसी प्रकरणी शेतकर्यांनी घेतली उपमुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे यांची भेट ,उद्योगमंत्री मा उदय सांमत यांनाही दिले निवेदन

तामलवाडी एमआयडीसी प्रकरणी शेतकर्यांनी घेतली उपमुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे यांची भेट ,उद्योगमंत्री मा उदय सांमत यांनाही दिले निवेदन 


धाराशिव/ प्रतिनिधी रूपेश डोलारे:   तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील नियोजित औद्योगिक वसाहतीसाठी (एमआयडीसी) साठी संबंधित शेतकरी आपल्या वाहीक, बागायती जमीनी न देण्यावर ठाम असुन  संबंधित शेतकर्यांनी दि.१७ जून रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या व लेखी निवेदन दिले.

    मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील नियोजित औद्योगिक वसाहतीसाठी (एमआयडीसी) संबंधित शेतकरी आपल्या वाहीक व बागायती जमीनी न देण्याच्या भुमीकेवर ठाम आहेत. एमआयडीसी साठी शेतकर्यांनी विरोध दर्शविला असल्याने त्यांच्या जमीनीची मोजणी झाली नाही व शेतकर्यांचा विरोध असतानाही शेतकर्यांवर दबावतंत्राचा वापर होत असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या वाहीक बागायती जमीनींचे भुसंपादन झाल्यास शेतकरी रस्त्यावर येणार असुन कवडीमोल भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव असुन शेतकरी आपल्या वडीलोपार्जित वाहीक, बागायती जमीनी देणार नसल्याचे शेतकरी ठामपणे सांगत आहेत. आम्ही आमच्या वाहीक बागायती जमीनी तर देणार नाहीच परंतु एमआयडीसी भुसंपादन प्रक्रियेतुन शेतकर्यांचे गट वगळावेत अनेक संकटाचा सामना करत जीवन जगणाऱ्या शेतकर्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी तामलवाडी येथील शेतकर्यांनी दि.१७ जून रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेतली व आपली व्यथा मांडुन लेखी निवेदन सादर केले. तसेच उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्याकडेही लेखी निवेदन देण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडुन सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे शेतकर्यांनी सांगितले. तसेच अशा आशयाचे निवेदन शेतकऱ्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक अधिकारी लातुर तसेच महाव्यवस्थापक भुसंपादन यांना देण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.


माहीती अधिकारातून धक्कादायक माहिती समोर

---------------------------------------------------

तामलवाडी येथे नियोजित एमआयडीसी साठी तामलवाडी ग्रामपंचायतीच्या लेटरपॅडवर लिहुन परवाना घेतला असुन त्या तारखेमध्ये एमआयडीसीसाठी ग्रामपंचायतींच्या मासिक बैठकीत कुठलाही ठराव झालेला नाही किंवा ग्रामसभेमध्ये ठराव संमत करण्यात आला नसल्याची धक्कादायक माहिती माहीती अधिकारात मिळाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले असुन शेतकऱ्यांच्या वाहीक बागायती जमीनी हडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे शेतकर्यांनी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments