दुर्दैवी घटना :शेतातील गोठ्यात विजेचा शॉक लागून सासु -सुन ठार, सोलापूर जिल्ह्यातील घटना
सोलापूर प्रतिनिधी/रुपेश डोलारे : माळशिरस तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्याला मागील चार दिवसापासून पावसाने झोडपले आहे. या पावसामुळे गायीच्या गोठ्यात विजेचा प्रवाह उतरला होता.यामुळे दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि 6 रोजी सकाळी घडली आहे. सासू रशिका विठ्ठल रेडे (वय 57) आणि सून सुवर्णा अमोल रेडे (वय 27) यांचा अशी या मृत महिलांची नावं आहे.या दोघींसह एक गायही दगावली आहे. ही घटना सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथे घडली आहे.या घटनेने रेडे कुटुंबियांवर आणि ग्रामस्थावर शोककळा पसरली आहे. रक्षाबंधन सणाच्या तोंडावर एकाच घरातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मागील चार दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे या पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले होते. सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे गाईच्या गोठ्यात विजेचा प्रवाह उतरला आणि यामुळे एका गाईसह कुटुंबातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथे घडली आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की सकाळी सहाच्या सुमारास रशिका रेडे यांनी नेहमीप्रमाणे गाईच्या गोठ्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. गोठ्यात गेल्यानंतर गाईला शॉक लागून ती खाली पडलेली त्यांना दिसली. यावेळी गाईला उठवण्याचा प्रयत्न करत असताना रशिकाबाईंना विजेचा धक्का बसला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळात सुवर्णा रेडे या गोठ्यात गेल्या असता त्या नाही या विजेचा झटका बसून त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे गोठ्यात विजेचा प्रवाह उतरल्यामुळे रशिका रेडे आणि सुवर्णा रेडे यांचा मृ्त्यू झाला. या दोघींसह एक गायही दगावली आहे.
दरम्यान रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे गोठ्याच्या पत्राशेडमध्ये पाणी साचून, तिथे शॉर्टसर्किट झाल्याची अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेचा तपास अकलूज पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी दीपक भोसले करत असून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहेत एकाच कुटुंबातील दोन महिलांचा व एका गाईचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
घटनास्थळाची पाहणी केली आहे. संपूर्ण पत्र्याच्या शेडमध्ये वीज उतरल्याने ही घटना घडली. विद्युत निरीक्षकांना कळवण्यात आले असून, त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील तपासाची दिशा ठरवण्यात येईल.- विक्रम साळुंखे. सहाय्यक पोलीस निरीक्षक
0 Comments