धाराशिव ब्रेकिंग: जमिनीच्या वादातून चुलत्या कडून पुतण्याचा चाकुणे भोसकुन खुन., धाराशिव जिल्ह्यातील थरारक घटना!Murder Crime
#
धाराशिव, दि. २० (प्रतिनिधी)/रूपेश डोलारे :
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे जमिनीच्या वादातून काकानेच पुतण्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून कुटुंबातील वाद किती टोकाला जाऊ शकतो याचे हे भयावह उदाहरण समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुजित ज्ञानेश्वर शेळके (वय अंदाजे तरुण) हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. आरोपी विलास शिवाजी शेळके हा आपल्या आई-वडिलांशी जमिनीच्या वादावरून सतत वाद घालत होता आणि त्यांना मारहाण करत होता.
दि. १८ रोजी रात्रीही याच कारणावरून घरात वाद सुरु असताना, आजी-आजोबांना वाचवण्यासाठी सुजित मध्ये पडला. यावेळी संतप्त झालेल्या विलास शेळके याने “तुला जमीन देणार नाही, तू जास्त माजलास” अशी धमकी देत सुजितवर चाकूने वार केले.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुजितचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी मृताची आई फिर्यादी नामे- मनिषा ज्ञानेश्वर शेळके यांनी दि.19.04.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे शिराढोण येथे भा.न्या.सं.कलम 103(1), 118(1), 333, 352, 351(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर व पोलीस उपनिरीक्षक चोपणे हे करत आहेत.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नात्यांमधील वैर किती भयानक रूप धारण करू शकते याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे.

0 Comments