अनैतिक संबंधातून गळा चिरून खून; धाराशिव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल-MurderCrime News
धाराशिव: धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका ४० वर्षीय व्यक्तीचा धारधार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना १२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५:३० ते १३ जुलै २०२६ रोजी सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास येडशी फॉरेस्ट जवळील कुमाळवाडी शिवार येथे घडली.
संतोष उर्फ (दगडू) बाबासाहेब देशमुख (वय ४० वर्ष, रा. येडशी, ता. जि. धाराशिव) असे खून झालेल्या मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अजित बाबासाहेब देशमुख (वय ३५ वर्ष, रा. येडशी) यांनी १४ जुलै २०२६ रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे.
अनैतिक संबंधातून हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, मृत संतोष देशमुख यांची पत्नी वैशाली आणि संशयित आरोपी बालाजी मिटू पायघान (रा. पांगरी, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांच्यात अनैतिक संबंध होते. याच अनैतिक संबंधांच्या कारणावरून आरोपीने संतोष देशमुख यांचा काटा काढण्याचे ठरवले. कुमाळवाडी शिवार परिसरात गाठून आरोपीने कोणत्यातरी धारधार वस्तूने संतोष यांचा गळा चिरला आणि त्यांना जागीच जिवे ठार मारले.
पोलिसात गुन्हा दाखल
मृत संतोष यांचे भाऊ अजित देशमुख यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून (FIR) धाराशिव ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपी बालाजी पायघान याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपीचा शोध सुरू आहे.

0 Comments