Hot Posts

6/recent/ticker-posts

सोयाबीन काढण्यासाठी शेतकऱ्याची धांदल सुरू, मजुराचा तुटवडा पावसाच्या भीतीमुळे शेतकरी मेटाकुटीला

 

सोयाबीन काढण्यासाठी शेतकऱ्याची धांदल सुरू, मजुराचा तुटवडा पावसाच्या भीतीमुळे शेतकरी मेटाकुटीला 


 तुळजापुर/बालाघाट न्युज टाइम्स: तुळजापूर तालुका परिसरात  मगील आठ दिवसापासून सोयाबीन काढण्यासाठी शेतकऱ्याची धांदल सुरू आहे. बळीराजा सुगीमध्ये व्यस्त झाला आहे मात्र ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे लवकरात लवकर सुगी उरकण्याचा बळीराजाचा कल आहे त्यातच शेतमजुराचा तुटवडा भासत असल्यामुळे शेतकरी मेटाकोटीस आला आहे.

 परिसरात प्रामुख्याने खरिपातील नगदी पीक म्हणून सोयाबीन पीक घेतले जाते. यावर्षी सततच्या पावसामुळे पिकांना अपुरा सूर्यप्रकाशामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. दुबार पेरणी, खुरपणी करूनही शेतामध्ये पिकापेक्षा तणच आले आहेत, बी बियाणी व खताच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यातच तन व पिकातील स्पर्धा कमी करून  पिकांचे जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी रात्रंदिवस  काबाड कष्ट करत असताना दिसतात, तण मारून टाकण्यासाठी शेतकरी महागड्या तणनाशकाचा वापर करत असतात. परंतु तन नाशकाच्या किमतीही भरमसाठ वाढले आहेत, एवढ्या व्यापातून आता काढणीस आलेले पिके काढण्यासाठी परतीच्या पावसाचा तडाखा बसत आहे, त्यातच मजुराचा तुटवडा भासत आहे तरीही मागील ती मजुरी देऊन शेतकरी पिकांची काढणी करून घेत आहेत. यामुळे सामान्य शेतकऱ्याचे खर्चाची आर्थिक बजेट कोलमडून  पडले आहे. एकंदरीत बळीराजाला कायम आसमानी व सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे.

Post a Comment

0 Comments