Hot Posts

6/recent/ticker-posts

अरे खोप्यामध्ये खोपा,सुगरणीचा चांगला..... सुगरण पक्ष्यांनी घरकुलासाठी केलेली सुंदर कलाकुसर

अरे खोप्यामध्ये खोपा,सुगरणीचा चांगला.....  सुगरण पक्ष्यांनी घरकुलासाठी केलेली सुंदर कलाकुसर.                  


  तुळजापुर/बालाघाट न्युज टाइम्स:   निसर्गाने  हिरवा शालू परिधान करताच, सुगरण पक्षांनाही विनीच्या हंगामाचे वेध लागले आहेत आपल्या निरागस पिलांना सुरक्षीत घर मिळावे, बाल्यावस्थेत सर्व संकटापासून मुक्त रहावी यासाठी सुग्रण पक्षातील नर विहिरींच्या अथवा ओढ्याच्या काठावर असलेल्या काटेरी झुडपावर मनमोहक नक्षीकाम केलेले घरटे तयार करतात, पक्षाचे जग मोठा रमणीय, आकाशात विहरणारं स्वच्छंद आयुष्य मात्र अशा आयुष्य नाही विसावणारा घरकुल हवं असतं, पक्ष्यांची घरटी हा कलाकुसरीचा अत्यंत सुंदर नमुना असतो. काडी काडी जमवून पक्षी स्वतःही कलाकुसर करून ऊन पावसापासून संरक्षण करणारे घरटे बांधतात, पावसाळ्याच्या सुरुवातीला रानावनात फिरताना सुगरण पक्षाची नक्षीकाम केलेली मनमोहक घरटी मानवाला भुरळ घालतात आणि नकळत बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या ओळी आठवतात .


अरे "खोप्यामधी खोपासुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं, झोका झाडाले टांगला," या बालपणी पुस्तकात अभ्यासलेल्या ओळी पाखराचे जगणे सांगतात ज्या सुगरण पक्षावरून ही कविता बहिणाबाईंनी सुचली ते दिसायला जसे मोहक असतात तशीच त्यांची कलाकुसरही सुबक असते हे सुगरण पक्षी एखाद्या झाडावर जणू आपले गावात बसवतात जिथे मानवी रहदारी कमी असेल किंवा आपले गाव दिसणार नाही अशी झाडे हा पक्षी निवडतो या एकाच झाडावर त्यांची पंधरा ते वीस जणांची वस्ती असते सुगरण पक्षाच्या घराचा आकार पालथ्या चंदू सारखा असतो सुरवातीला फांद्गयाभोवती वताचे गवताची धागे घट्ट वीण मजबूत लोंबता दोर तयार करतात हा दोर एकट्या माणसाला तुटत नाही. त्याच्या आधारावर घरटे लोंबत ठेवली जाते, घरटे मनोमध रुंद विनुन दोन भाग केले जातात पहिला भाग बंद करून त्याला फुग्यासारखा आकार असतो दुसरा भाग म्हणून लांब व रुंद नळीसारखा बनवला जातो. सुगरण पक्षी हा अद्भुत चातुर्य बुद्धी शाली असणारा स्वतःचा निवारा बनवणारा चिमणीपेक्षा याचे घरटे वेगळे असते सुगरण पक्षाला निवारा तयार करण्यासाठी खूप वेळ लागतो कारण त्याच्या घरट्या पाशी कोणत्याही प्रकारचा प्राणी माणूस त्या निवारा असलेल्या ठिकाणी जाता येऊ नयेत अशा ठिकाणी सुगरण पक्षी घरटे बनवतो, परंतु अलीकडच्या काळामध्ये वाढत्या शहरीकरणामुळे वाढत चाललेले प्रदूषण व आधुनिक शेतीमध्ये वापरण्यात येणारे रासायनिक खते व कीटकनाशके यामुळे पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत चाललेली आहे.
शब्द संकलन: राजगुरु साखरे.


Post a Comment

0 Comments