Hot Posts

6/recent/ticker-posts

कळंब तालुक्यातील मलकापूर शिवारात हिंस्र प्राण्यांनी पाडला वासराचा फडशा ,हिंस्र प्राणी बिबट्या का वाघ ? वन अधिकारी संभ्रमात

कळंब तालुक्यातील मलकापूर शिवारात हिंस्र प्राण्यांनी पाडला वासराचा फडशा ,हिंस्र  प्राणी बिबट्या का वाघ ? वन अधिकारी संभ्रमात



 धाराशिव : कळंब तालुक्यातील मलकापूर शिवारात गुरुवारी (ता.२६) रात्री अज्ञात हिंस्त्रप्राण्याने वासराची शिकार केल्याची घटना दहा वाजेच्या सुमारास घडली. शेतकऱ्यांना वासराला ज्वारीच्या पिकात वासराला हिंस्त्रप्राण्याने ओढत नेल्याच्या प्रकार पहिलाच प्रकार घडला आहे. वनविभागाला या घटनेची माहिती देताच वनविभागचे गस्त पथक दाखल तात्काळ घटनास्थळी झाले होते. येडशी अभयारण्यात वाघाचा मुक्काम वाढणार असून शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाकडून शेतकऱ्यांचे सुरक्षितता, बचाव, व्याघ्रसंरक्षण या बाबत समुपदेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून येडशी अभयारण्यातील वाघ या भागात आल्याची चर्चा होत होती.

येडशीच्या अभयारण्यात गेल्या तीन दिवसांपासून वनविभागने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघाचे रोजच दर्शन होतं असून मंगळवारी बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी तलाव परिसरात वाघ दिसल्याची माहिती आहे. येडशी अभयारण्यालगत बालाघाटतील. वडगाव, चोराखळी, उक्कडगाव, पिंपळवाडी (ता. बार्शी) श्री.येडेश्वरी मंदिर येरमाळा परिसरात सार्वजनिक वनविभागाचे वनक्षेत्र आहे.

गुरुवारी (ता.२६) कळंब तालुक्यातील मलकापूर येथील शेतकरी  यशवंत लोमटे यांचा मुलगा शेतात गेले असता त्याला गाईचे वासरू वाघ सदृश्य चे  वन्य प्राणी फरफटेत घेऊन जात असल्याचे दिसले हा प्रकार दिसताच श्री.लोमटे हे आजूबाजूचे शेतकरी जमा होऊन आरडाओरडा केला. सदरील घटनेची माहिती वन विभाग अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत सदस्य आदित्य लोमटे यांनी संपर्क करून सदरील घटनेची माहिती देताच येडशी अभयारण्याचे वन्यप्राणी वनपरिक्षेत्रपाल ए. डी.मुंडे, वनविभाग भूम परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल दीपक गांधले वनरक्षक सतीश साळुंके, बालाजी ससाने, गजानन दांडगे, संकेत टाके, सागर जगताप, प्रमोद कांबळे, वनसेवक भारत काकडे सर्व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाच्या पथकाने जमावाला घरी पाठवून घटनास्थळाचा पंचनामा करुन त्याठिकाणी ट्रॅपकॅमेरे बसवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील चार तालुक्यात बिबट्या वाघाचा वावर असल्याचे वन विभागाने सांगितले आहे सध्या वन्य प्राण्यासह नामनिषद होत चाललेल्या राष्ट्रीय वाघ प्राण्याच्या येण्याने वन्यप्रेमी प्रेमी आनंदाचे वातावरण कुतूहल निर्माण झाल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसत असली तरी रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी अपरात्री शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी अभयारण्यात राहणाऱ्या इतर प्राण्यासह मानवी जीवाची तर मानवी जीवापासून दुर्मिळ वाघांचे संरक्षण होणे गरजेचे असल्याने मानवी जीवाकडून सुरक्षितसाठी वाघाला दगा फटका होण्याची शक्यता पाहता या परिसरातील शेतकऱ्याची संरक्षणास व्याग्रज रक्षणाबाबत वन विभागाकडून समुपदेशन होणे गरजेचे आहे.

भीतीचे वातावरण असल्यामुळे नागरिकांना समुपदेशनाची गरज

जिल्ह्यातील चार तालुक्यात बिबटया, वाघाचा वावर असल्याचे वनविभागाने सांगितले आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यात भीतीचे वातावरण आहे. असे असले मानवापासून दुर्मिळ वाघाचे संरक्षण होणे गरजेचे आहे. मानवाकडून वाघाला दगा फटका होण्याची शक्यता पाहता या परिसरातील शेतकऱ्यांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. यासंदर्भात अभयारण्याचे वन्यप्राणी वनपरिक्षेत्रपाल ए. डी. मुंडे यांना दोन वेळा संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही

मलकापूर येथे बिबट्याने वासरावर हल्ला करुन ठार केल्याचा पंचनामा केला आहे. पाऊस पडल्याने ठशांचे पंचनामे करण्यात अडचण आली. ठसे बिबट्या सदृश्य प्राण्याचे असून वासरु हल्यात मृत्युमुखी पडल्याने संबधित शेतकऱ्याला वनविभागाकडून नुकसानभरपाई मिळेल. शेतामध्ये रात्री अप रात्री आवश्यक असेल तरच शेतकऱ्यांनी बाहेर पडावे हातामध्ये काठी बॅटरी असावी मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावावीत किंवा मोठ्या आवाजात बोलावे म्हणजे वाघ बिबट्या जवळ येणार नाही.
दीपक गांधले. वनपरीक्षेत्र अधिकारी भूम.

Post a Comment

0 Comments