साई मंदिरात फुल- हार प्रसाद नेण्यास परवानगी खरेदी केल्याची पावती दाखवावी लागणार
शिर्डी : काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव साई समाधी मंदिरात फुलहार व प्रसाद नेण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र गुरुवारी दिनांक 12 रोजी साईबाबा संस्थान च्या तदर्थ समितीने घेतलेल्या निर्णयानुसार आता भाविकांना पावतीच्या आधारे फुलहार व प्रसाद नेण्यास परवानगी देण्यात आली आहे हा निर्णय साई भक्त व ग्रामस्थांनी स्वागतार्थ मानला आहे.
कोरोना काळात साई मंदिरात फुलहार व प्रसाद नेण्यावर बंदी घालण्यात आली होती त्याचा फटका शिर्डीतील फुल विक्रेते व परिसरातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना दोन ते तीन वर्षे भोगावे लागल्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या न्यायालयीन लढ्यानंतर ही बंदी उठवण्यात आली होती. फुल हार व प्रसाद पुन्हा सुरू झाल्यानंतर काही दुकानदारांनी ज्यादा दराने विक्री सुरू केल्याचे निदर्शनास आल्याने भाविकांची लूट होत होती.
याच पार्श्वभूमीवर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी संबंधित व्यवसायिकांची बैठक घेऊन त्यांना दुकानासमोर दर फलक लावण्याचा सूचना केल्या नगर परिषदेला देखील याबाबत कारवाईचे आदेश देण्यात आले दरम्यान काश्मीरमधील हल्ल्यानंतर शिर्डी मधील साई भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुन्हा एकदा फुलहार व प्रसाद घेण्यावर बंदी आणली यामुळे फुल उत्पादक व छोटी व्यवसाय पुन्हा आर्थिक संकटात संपले या बंदीचा परिणाम लक्षात घेता आणि भाविकांचे होणारे लूट थांबवण्यासाठी अखेर 12 जून रोजी साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीने फुलहार व प्रसाद देण्यास अटीवर परवानगी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार भाविकांनी पूजेचे साहित्य ज्या दुकानातून विकत घेतली त्याची पावती मंदिर प्रवेशाजवळ दाखवल्यानंतरच फुलहार व प्रसाद मंदिरात नेण्यास अनुमती दिली जाणार आहे या निर्णयामुळे जादा दराने विक्री करणाऱ्या दुकानावर नियंत्रण येणार असून साई भक्ताची लूट थांबणार आहे प्रथमच संस्थानी असा निर्णय घेतल्याने भाविक व ग्रामस्थांनी त्याचे स्वागत केले आहे.
0 Comments