दुर्दैवी घटना: वीज कोसळून दोन सख्ख्या भावासह चौघांचा मृत्यू ,दोघे गंभीर जखमी सिल्लोड तालुक्यातील घटना
छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड शहरासह तालुक्यात शनिवारी दिनांक १४ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकटासह जोरदार पाऊस झाला यात वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह एक तरुण व महिला अशा चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला; तर दोघे गंभीर जखमी झाले तसेच चार जनावरे ही दगावले.शेतकरी पेरणीच्या तयारीत व्यग्र असतानाच मुसळधार पावसात झालेल्या विजेच्या तांडवाने या कुटुंबांवर आभाळच कोसळले. मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून योग्य ती मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास तालुक्यात सर्व जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट सुरू झाला काही वेळातच पावसाला सुरुवात झाली यावेळी सारोळा शिवारातील गट क्रमांक 294 मध्ये रोहित राजू काकडे वय (21) व यश राजू काकडे वय (14) हे दोघे भाऊ शेतात काम करत होते. विजांचा कडकडाट सुरू होताच त्यांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली तेवढ्यात वीज कोसळी यात होरपळून दोघांचाही जागेच मृत्यू झाला दुसऱ्या घटनेत मोडा बुद्रुक शिवारातील गट क्रमांक 266 मध्ये दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी रंजना बापूराव शिंदे वय 50 या शेतात काम करत होत्या दरम्यान अचानक वीज पडून त्यांचा मृत्यू झाल त्यांच्यावर मोडा बुद्रुक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले तिसऱ्या घटनेत पिंपळदरी येथे शिवराज सतीश गव्हाणे वय (28) याचा वीज पडून मृत्यू झाला.
म्हैस आणि तीन वासरे दगावली
मांडणा येथील गट क्रमांक 295 मध्ये वीज पडून न्यानेश्वर माणिकराव लोखंडे यांच्या शेतातील तीन वासरे दगावली तर अन्वी शिवारातील गट क्रमांक 139 मध्ये नारायण सांडू बांबर्डे यांची एक म्हैस मृत्यूमुखी पडली अशी माहिती मिळाली आहे.
दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव
खातखेडा तालुका सिल्लोड येथील विशाल ज्ञानेश्वर शिंदे वय (22) या तरुणाच्या बाजूलाच वीज पडली यात तो बेशुद्ध झाला काही वेळाने तो शुद्धीवर आला दैवबलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला तर पिंपळदरी येथील जीवन सतीश गव्हाणे हे जखमी झाले ते मयत शिवराज गव्हाणे हे सख्खे भाऊ होते. वीज कोसळल्याने त्याची दोन्ही पाय भाजले त्यांच्यावर सिल्लोड येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मृग नक्षत्राने पेरणीला वेग, पण संकट ओढावले
शुक्रवारपासून मृग नक्षत्राने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी आनंदात होते. अजिंठा मंडळात 70 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे पेरणीच्या कामांना वेग आला होता. परंतु शनिवारी दुपारी आलेल्या वादळी वाऱ्यांसह पावसाने या आनंदावर विरजण टाकले. अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्याने पिकांचे नुकसान झाले.
0 Comments