नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांची आत्महत्या, प्रश्नचिन्ह निर्माण करणारी शैक्षणिक स्पर्धा
छत्रपती संभाजीनगर : वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रांजणगाव शेणपुंजीत मंगळवारी दिनांक 17 रोजी एका वीस वर्षीय विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. श्रीकांत अंगद शिंदे राहणार ओम साईनगर असे विद्यार्थ्यांचे नाव असून तो डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून गेली दोन वर्षे परीक्षेची तयारी करत होता.
श्रीकांतला नेट परीक्षेत अपेक्षित नुसार गुण न मिळाल्याने तो मानसिक तणावात होता मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घरातील किचनमध्ये सिलिंग फॅनला टॉवेल बांधून त्यांनी गळफास घेतला काही वेळानंतर ही बाब घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी घाटी रुग्णालयात देण्यात आली; मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले या घटनेमुळे परिसरात हळूहळू व्यक्त होत असून एक अभ्यासू आणि शांत स्वभावाचा मुलगा असे त्याचे वर्णन शेजारी करत आहेत पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल एकनाथ गिरी करत आहेत.
प्रश्नचिन्ह निर्माण करणारी शैक्षणिक स्पर्धा
दरम्यान नीट परीक्षेसाठी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थ्यावर होणारा मानसिक दबाव पुन्हा एकदा समोर आला आहे योग्य मार्गदर्शन आणि कौटुंबिक आधार अभावामुळे अनेक विद्यार्थ्यांसाठी जीव घेणा ठरत असल्याचे चित्र या घटनेतून स्पष्ट होते.
0 Comments