Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात उत्कृष्ट दर्जाचे खते बियाणे उपाययोजना करा व बोगस खते बियाणे विक्री विरुद्ध तालुका निहाय भरली पथकाची स्थापना करा-

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात उत्कृष्ट दर्जाचे खते बियाणे उपाययोजना करा व बोगस खते बियाणे विक्री विरुद्ध तालुका निहाय भरली पथकाची स्थापना करा- अखिल भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाचे महाराष्ट्र सचिव तांबोळी यांचे जिल्हाधिकारी निवेदन


 धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे:    जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात उत्कृष्ठ दर्जाचे खते-बियाणे मिळण्यासाठी उपयोजना करणे. व बोगस खते-बियाणे विक्रीविरोधात तालुका निहाय भरारी पथकांची स्थापना करा अशी मागणी भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाचे महाराष्ट्र सचिव तांबोळी यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, यावर्षी धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात उत्कृष्ठ दर्जाचे खते-बियाणे मिळावे या करिता उपयोजना करावे. कारण वर्षे २०२० साली मराठवाड्यात व पश्चिम महाराष्ट्रात बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. विशेषतः धाराशिव जिल्हातील शेतकरी दुबार पेरणीमुळे प्रचंड संकटात सापडला होता.

विशेषतः शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचे चे बियाणे उत्कृष्ठ दर्जाचे मिळणे गरजेचे आहे. व खते-बियाणे उपलब्ध असताना सुद्धा ती शेतकऱ्यांना मिळत नाहीत. काही व्यापारी खते व बियाणे एकाच वेळेस घेणे अनिवार्य करत असतात. नाही तर युरिया सारखे खते उपलब्ध असून सुद्धा शेतकऱ्यांना देत नाहीत. याची पुढील काळात प्रशासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे. व बोगस खते बियाणे विक्रीविरोधात तालुकानिहाय भरारी पथकांची स्थापना करावी व पथका मार्फत दोषी विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. असे निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments