Hot Posts

6/recent/ticker-posts

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर खताच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे शेतकरी अडचणीत

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर खताच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे शेतकरी अडचणीत


धाराशिव : आगामी खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असून, शेतमालाच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे.

शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर जवळपास अनिवार्यच झाला आहे. त्यामुळे शेतीच्या उत्पादन खर्चात रासायनिक खताच्या किमती महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यात गेल्या काही वर्षांत सततची वाढच होत असल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडत असल्याची स्थिती आहे.

केंद्र सरकारने २०२५ -२६ खरीप १४ पिकांचे हमीभाव वाढवले असल्याचे सरकार मोठ्या दिमतीने सांगत असले तरी खताची केलेली भाववाढीचा सरकार कुठेच उल्लेख करत नाही त्यामुळे सजग शेतकरी सरकारचा हा ओळखला असून हे सरकार शेतकऱ्यांची नसल्याचे पुन्हा एकदा कृतीतून दिसून येत आहे.

केंद्र सरकारने सोयाबीनच्या हमीभावात प्रति क्विंटल ४३६ रुपयांची वाढ केली सोयाबीनचा हमीभाव आता ५३२८ रुपये झाला आहे तर मध्यम आणि लांब धाग्याच्या कापसासाठी प्रति क्विंटल ५८९ रुपयांची वाढ केली आहे त्यामुळे खरीप हंगाम २०२५ -२६ साठी मध्यम धाग्याच्या कापसासाठी ७७१० रुपये हमीभाव असणार आहे तर लांब धाग्याच्या कापसासाठी ८११० हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.

तुरीच्या हमीभावात ही ४५० रुपयांची वाढ करण्यात आली. तुरीचा हमीभाव यंदाच्या खरीप हंगामात ८ हजार रुपये असणार आहे तर मक्याच्या हमीभावातील १७५ रुपयाची वाढ करण्यात आली आहे तर यंदा मक्याचा हमीभाव आता २४०० रुपये झाला आहे ज्वारीच्या हमीभावात ही ३२८ रुपयांची वाढ करण्यात आली हायब्रीड ज्वारीला आता ३६९९ रुपये हमीभाव असेल तर मालदांडी ज्वारीला ३७४९ रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.

हमीभाव वाढी व सुपला खतामध्ये तबला आठ टक्के पासून षयी माहिती देताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विन वैष्णव म्हणाले परंतु सरकारने खताची भाव वाढ करत शेतकऱ्याच्या मानावर सूरी ठेवलेली सरकार सांगत नाही सुफला खतामध्ये तब्बल ८ टक्के  पासून २० टक्के  पेक्षा जास्त भाव वाढ केली आहे हे मात्र सरकार कुठेही सांगताना दिसत नाही त्यामुळे गुळाचे बोट दाखवून शेतकऱ्याचा केसाने कापण्याची कामे सरकार करत असल्याचे शेतकरी बांधवातून बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments