मौजे केशेगाव येथील भाजपाचे गट प्रमुख तथा सरपंच मल्लिनाथ गावडे यांनी केली शहापूर गटातील नुकसान ग्रस्त खरीप पिकांची पाहणी.

Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे केशेगाव येथील भाजपाचे गट प्रमुख तथा सरपंच मल्लिनाथ गावडे यांनी केली शहापूर गटातील नुकसान ग्रस्त खरीप पिकांची पाहणी.

मौजे केशेगाव येथील भाजपाचे गट प्रमुख तथा सरपंच मल्लिनाथ गावडे यांनी केली शहापूर गटातील  नुकसान ग्रस्त खरीप पिकांची पाहणी.


""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

*शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळण्यासाठी करणार प्रयत्न.*

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):-  तुळजापुर तालुक्यामध्ये मागील काही दिवसापासुन अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप पेरणी झालेल्या क्षेत्रावरील सोयाबीन, उडीद, मुग, तुर ही सर्वच पिके बाधीत झाली आहेत. तुळजापूर तालुका देखील याला अपवाद नाही. या नुकसानीची भाजपाचे शहापूर गट प्रमुख तथा सरपंच मल्लिनाथ गावडे यांचा यांनी शेतकऱ्यांसमवेत शहापूर गटातील केशेगाव , गुळहळी , निलेगाव, बाभळगाव, सराटी, इटकळ , केरुर येथे प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली.तुळजापूर तालुक्यातील केशेगावं इटकळ सराटी धनगरवाडी गुळहळी केरुर उमरगा चि.आदि गावातील शेतामध्ये पाणी साठुन राहिल्याने सोयाबीन, उडीद, मुग, तुर इत्यादी पिकांची वाढ खुंटली आहे. तसेच फुलगळ झालेली असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. सोयाबीन पिकावर मुळकुज, मानकुज आणि शेंगकरपा अशा प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सोयाबीन जरी दिसायला हिरवेगार दिसत असले तरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.  त्यामुळे  सर्वच पिकांचे  ७० टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असल्याने हाता तोंडाशी आलेला घास हिराऊन घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये म्हणून अतिवृष्टीचे पंचनामे तात्काळ करावेत,एकही शेतकरी नुकसान होऊन तो मदतीपासुन वंचित राहणार नाही याची दक्षता घेणार असल्याचे ही सरपंच मल्लिनाथ गावडे यांनी  सांगितले.याप्रसंगी शहापूर गटातील भाजपाचे कार्यकर्ते शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments