धक्कादायक घटना : हुंड्याच्या छळाला कंटाळून 19 वर्षीय विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल-Dharashiv District Incident Crime News
तुळजापूर (धाराशिव) : तुळजापूर शहरातील विवेकानंदनगर परिसरात 19 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हुंड्याच्या कारणावरून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत नम्रता शुभम कदम (वय 19, रा. शेकापुर, ता. जि. धाराशिव) हिने दि. 24 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 11.45 वाजण्याच्या सुमारास तुळजापूर येथील विवेकानंदनगर परिसरात राहत्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी फिर्यादी निता गणेश गरड (वय 40, रा. विवेकानंदनगर, ता. तुळजापूर) यांनी दि. 27 एप्रिल 2026 रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गंभीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी शुभम मोहन कदम (पती), जयश्री मोहन कदम, अंजली अशोक यादव (रा. अमृतवाडी), दिपाली संतोष सुरवसे (रा. बार्शी) व सोनाली बालाजी मोहिते (रा. सांजा) यांनी नम्रता हिच्यावरयेणाऱ्या धोंड्याच्या महिन्यात माहेरहुन पाच तोळे सोने घेवून ये नाही तर तुला घरात घेणार नाही व शुभमचे दुसरे लग्न लावून देवू अशी धमकी देवून मारहाण करुन शारीरीक व मानसिक दिलेने त्यांचे त्रासाला कंटाळुन मयत नम्रता हिने आत्महत्या केली आहे. तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या सततच्या त्रासाला कंटाळून नम्रता हिने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर तुळजापूर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 108, 85, 115(2), 352, 351(3) अन्वये पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून हुंडाबळीच्या घटनांबाबत पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

0 Comments