कार्यक्रमातील किरकोळ वादातून हाणामारी; महिला व नातेवाईकांवर दगड, बाटल्या आणि लोखंडी पाईपने हल्ला- सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल-Kalanb Taluka News Live
कळंब : तालुक्यातील कल्पना नगर येथील पारधी पिढीत आयोजित कार्यक्रमादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिनाबाई राजेश पवार (वय 22, रा. मांग वडगाव, ता. केज, जि. बीड) या दि. 26 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास कल्पना नगर, कळंब येथील पारधी पिढीत आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यावेळी हिनाबाई यांच्या दिराच्या कार्यक्रमात “तू एवढ्या चपात्या कुठे घेऊन चालला, तुझ्या पाहुण्याला का वाढतोस?” या कारणावरून वाद निर्माण झाला.
या वादानंतर आरोपींनी एकत्र येऊन गैरकायद्याची मंडळी जमवली आणि फिर्यादी तसेच इतरांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे. आरोपींनी लाथाबुक्क्यांसह दगड, बिअरच्या बाटल्या, लोखंडी पाईप आणि काठ्यांचा वापर करून हल्ला केल्याने काही जण जखमी झाले.
या प्रकरणी सुरज तानाजी पवार, बिरु बप्पा पवार, अरुण सुभाष पवार, संत्या शिवराम पवार, कल्लु राजा पवार आणि सुभाष सुरेश पवार (सर्व रा. कल्पना नगर, कळंब) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिनाबाई पवार यांनी 1 जून 2026 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 115(2), 189(1), 189(2), 191(1), 191(2) व 190 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास कळंब पोलीस करीत आहेत.
कार्यक्रमातील किरकोळ कारणावरून झालेल्या या हाणामारीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

0 Comments