तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी फिरवली हळद पिकांकडे पाठ , पिक नामशेष होण्याच्या मार्गावर
तुळजापुर/बालाघाट न्युज टाइम्स: हळद लागवडीमध्ये केलेला खर्चही निघणे अवघड झाल्याने मागील पाच-सहा वर्षांपासून तुळजापूर तालुका परिसरातील शेतकऱ्यांनी हळद पिकाकडे पाठ फिरवली आहे, परिणामी लागवडीचे क्षेत्रही घटले आहे. हळदीची पीक घेणारी शेतकरी उन्हाळ्यात शेतीची मशागत करून मृग नक्षत्रामध्ये लागवड केली जाते ,हळद पिक हे दहा महिन्याचे पीक असून यामध्ये सुरुवातीला बियाणे, रासायनिक खते, आंतरमशागती, काढणी, हळद शिजवणे वाळवणे या प्रक्रियेला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो आहे, मात्र खर्चाच्या तुलनेत हळदीला योग्य बाजार भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना हळद पीक फायद्याचे ठरत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी कमी कालावधीमध्ये निघणारे सोयाबीन पिकास नगदी पीक म्हणून पसंती दिली आहे.तुळजापूर तालुक्यातील , चिवरी आरळी( खु) ,आरळी( बु), चिंचोली, काळेगाव , येवती, बिजनवाडी, तीर्थ, आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर हळदीची लागवड केली जात होती. गावागावांमध्ये पिढीजात हळदीचे उत्पादन घेणारे शेतकरी राहायचे मात्र मागील पाच-सहा वर्षापासून हळदीला योग्य दर मिळत नसल्याने सोन्यासारखी पिवळी धमक असणाऱ्या हळदीचा रंग फिका पडू लागला आहे. पूर्वी सोन्याच्या बरोबरीने असणारे हळदीचे दर घसरल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
0 Comments