आईला मेसेज केल्याच्या रागातून मित्राचा खून; १७ वर्षीय मुलाकडून थरारक कृत्याने जालना हादरले-Jalna Murder Crime News
जालना : तालुक्यातील सिरसवाडी येथे शुक्रवारी दि,१० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मैत्रीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली. आपल्या आईच्या मोबाईलवर मित्राने मेसेज केल्याच्या रागातून एका १७ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त मुलाने आपल्या जिवलग मित्राचा धारदार शस्त्राने निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत तरुणाचे नाव निखिल अनिल वाघमारे (वय २६) असे असून, आरोपी आणि निखिल हे एकमेकांचे चांगले मित्र होते. दोघांमध्ये घरच्यासारखी वावर होती. दररोजप्रमाणे शुक्रवारी रात्रीही मित्रमंडळी शेतात झोपण्यासाठी गेली होती. मात्र, आरोपी त्या दिवशी शेतात गेला नव्हता.
दरम्यान, घरी असताना आरोपीने आपल्या आईच्या मोबाईलमध्ये निखिलने पाठवलेले मेसेज पाहिले. हे मेसेज पाहताच तो संतापाने पेटून उठला. रागाच्या भरात त्याने मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास शेतात धाव घेतली. तेथे झोपलेल्या निखिलवर चाकूने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष साबळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. निखिलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. शनिवारी दुपारी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आरोपी अल्पवयीन असून नुकतेच बारावीचे पेपर दिले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी संशयित मुलाला ताब्यात घेतले असून चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. "मित्राने आईला मेसेज केला म्हणून मी त्याची हत्या केली," असे त्याने सांगितले.
या प्रकरणी आरोपीला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. सिरसवाडी गावातील या घटनेमुळे संपूर्ण जालना जिल्हा हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जालना : तालुक्यातील सिरसवाडी येथे शुक्रवारी दि,१० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मैत्रीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली. आपल्या आईच्या मोबाईलवर मित्राने मेसेज केल्याच्या रागातून एका १७ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त मुलाने आपल्या जिवलग मित्राचा धारदार शस्त्राने निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत तरुणाचे नाव निखिल अनिल वाघमारे (वय २६) असे असून, आरोपी आणि निखिल हे एकमेकांचे चांगले मित्र होते. दोघांमध्ये घरच्यासारखी वावर होती. दररोजप्रमाणे शुक्रवारी रात्रीही मित्रमंडळी शेतात झोपण्यासाठी गेली होती. मात्र, आरोपी त्या दिवशी शेतात गेला नव्हता.
दरम्यान, घरी असताना आरोपीने आपल्या आईच्या मोबाईलमध्ये निखिलने पाठवलेले मेसेज पाहिले. हे मेसेज पाहताच तो संतापाने पेटून उठला. रागाच्या भरात त्याने मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास शेतात धाव घेतली. तेथे झोपलेल्या निखिलवर चाकूने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष साबळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. निखिलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. शनिवारी दुपारी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आरोपी अल्पवयीन असून नुकतेच बारावीचे पेपर दिले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी संशयित मुलाला ताब्यात घेतले असून चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. "मित्राने आईला मेसेज केला म्हणून मी त्याची हत्या केली," असे त्याने सांगितले.
या प्रकरणी आरोपीला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. सिरसवाडी गावातील या घटनेमुळे संपूर्ण जालना जिल्हा हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

0 Comments